शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘आॅनलाइन’मुळे बंडखोरीला ऊत?

By admin | Updated: February 2, 2017 03:03 IST

महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे सक्तीचे असल्याने हजारो इच्छुक सध्या ही वेबसाइट सर्च करत असल्याने सर्व्हर डाउन होऊन हा अर्ज

ठाणे : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे सक्तीचे असल्याने हजारो इच्छुक सध्या ही वेबसाइट सर्च करत असल्याने सर्व्हर डाउन होऊन हा अर्ज भरण्याकरिता चारचार तास लागत आहेत. अजून एकाही मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसांत एकाच वेळी अर्ज भरण्यामुळे गोंधळ उडू शकतो, हे हेरून सर्वच राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आता त्यापैकी ज्यांना पक्षाचा ए-बी फॉर्म मिळेल, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अथवा मनसे कुठल्याही मोठ्या पक्षाने अजून आपल्या उमेदवारयाद्या जाहीर केलेल्या नाहीत. बंडखोरी टाळण्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर किंवा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर राजकीय पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करणार आहेत. गेल्या काही निवडणुकांचा हा शिरस्ता आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज दाखल करून त्याची प्रिंट काढून जर तो सादर करायचा असेल, तर गुरुवार-शुक्रवारी म्हणजे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्याकरिता वेबसाइटला भेट देतील आणि समजा सर्व्हर डाउन झाल्याने अनेकांना अर्ज भरता आला नाही, तर काही वॉर्डांत पक्षाचा अधिकृत उमेदवारच नाही, अशी पंचाईत होऊ शकते. हे हेरून राजकीय पक्षांनी प्रत्येक वॉर्डातील प्रमुख इच्छुकांना आॅनलाइन अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आहे. परिणामी, सोमवार-मंगळवारी वेबसाइटवर ताण येऊन सर्व्हर डाउन होऊन अर्ज भरण्यास चारचार तास लागले. चार पानांच्या अर्जात उमेदवाराला स्वत:ची माहिती देण्याबरोबरच मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपशील भरायचा आहे. अनेक उमेदवारांनी संगणकसाक्षरांची मदत घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी अर्ज भरले असून त्यात एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा समावेश आहे.आॅनलाइन अर्ज सर्वच इच्छुकांनी भरले असले, तरी ‘ए-बी’ फॉर्म एकाच्याच हाती पडणार असल्याने राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करून ठेवण्यास सांगितले असले, तरी ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते माघार घेणार का, हा सवाल आहे. कदाचित, या आॅनलाइनच्या गोंधळामुळे बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)