शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन’मुळे बंडखोरीला ऊत?

By admin | Updated: February 2, 2017 03:03 IST

महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे सक्तीचे असल्याने हजारो इच्छुक सध्या ही वेबसाइट सर्च करत असल्याने सर्व्हर डाउन होऊन हा अर्ज

ठाणे : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांना आॅनलाइन अर्ज दाखल करणे सक्तीचे असल्याने हजारो इच्छुक सध्या ही वेबसाइट सर्च करत असल्याने सर्व्हर डाउन होऊन हा अर्ज भरण्याकरिता चारचार तास लागत आहेत. अजून एकाही मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसांत एकाच वेळी अर्ज भरण्यामुळे गोंधळ उडू शकतो, हे हेरून सर्वच राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आता त्यापैकी ज्यांना पक्षाचा ए-बी फॉर्म मिळेल, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अथवा मनसे कुठल्याही मोठ्या पक्षाने अजून आपल्या उमेदवारयाद्या जाहीर केलेल्या नाहीत. बंडखोरी टाळण्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर किंवा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर राजकीय पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करणार आहेत. गेल्या काही निवडणुकांचा हा शिरस्ता आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज दाखल करून त्याची प्रिंट काढून जर तो सादर करायचा असेल, तर गुरुवार-शुक्रवारी म्हणजे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्याकरिता वेबसाइटला भेट देतील आणि समजा सर्व्हर डाउन झाल्याने अनेकांना अर्ज भरता आला नाही, तर काही वॉर्डांत पक्षाचा अधिकृत उमेदवारच नाही, अशी पंचाईत होऊ शकते. हे हेरून राजकीय पक्षांनी प्रत्येक वॉर्डातील प्रमुख इच्छुकांना आॅनलाइन अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आहे. परिणामी, सोमवार-मंगळवारी वेबसाइटवर ताण येऊन सर्व्हर डाउन होऊन अर्ज भरण्यास चारचार तास लागले. चार पानांच्या अर्जात उमेदवाराला स्वत:ची माहिती देण्याबरोबरच मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा तपशील भरायचा आहे. अनेक उमेदवारांनी संगणकसाक्षरांची मदत घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी अर्ज भरले असून त्यात एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा समावेश आहे.आॅनलाइन अर्ज सर्वच इच्छुकांनी भरले असले, तरी ‘ए-बी’ फॉर्म एकाच्याच हाती पडणार असल्याने राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करून ठेवण्यास सांगितले असले, तरी ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते माघार घेणार का, हा सवाल आहे. कदाचित, या आॅनलाइनच्या गोंधळामुळे बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)