शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कारण समजल्याशिवाय विसर्जन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:43 IST

दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

- मुरलीधर भवार डोंबिवली : शहरातील प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, गणेशमूर्ती काळी पडल्याने कार्यकर्ते व भक्त चक्रावून गेले आहेत. प्रसारमाध्यमांत वृत्त झळकताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली. प्रदूषण आणि मूर्ती काळी पडण्याचा काहीच संबंध नाही. मूर्तिकाराने मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो. त्यामुळे मूर्ती काळी पडली असावी, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेचे अधिकारी येथे फिरकलेले नाहीत.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गले म्हणाले, दावडीच्या राजाची मोठी एक आणि दोन लहान मूर्ती काळ्या पडल्या आहेत. परंतु, रासायनिक कारखान्यांचा परिसर हा मंडळाच्या ठिकाणापासून एक ते दीड किलोमीटर दूर आहे. दावडीच्या राजाच्याजवळच एका मैदानात भगवान मित्र मंडळानेही मूर्तीची स्थापना केलीआहे. परंतु, त्यांच्या मूर्तीला काहीही झालेले नाही. दावडीचा राजा घडवणाºया मूर्तिकाराने त्याच परिसरात सात मूर्ती दिल्या असून त्यांच्यावरही परिणाम झालेला नाही. त्यामुळे प्रदूषणामुळे मूर्ती काळी पडली, याला आधार नाही. मूर्तिकाराने वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो.पर्यावरण दक्षता मंचाच्या प्रकल्प समन्वयिका रूपाली शाईवाले म्हणाल्या की, मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगांची प्रयोगशाळेत तपासणी केलेली नाही. त्यामुळे मूर्ती प्रदूषणामुळेच काळी पडली, असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. मूर्तिकाराने प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती घडवली आहे. त्यावर हवेतील प्रदूषणाचा परिणाम होत नाही. मात्र, रंगात लेड अथवा मर्क्युरी हे घटक असल्यास त्याचा परिणाम होऊन मूर्तीचा रंग बदलण्याची शक्यता आहे. दावडीतील अन्य मूर्ती काळवंडलेल्या नाहीत. त्या मूर्तीही काळ्या पडल्या असत्या, तर प्रदूषणाचा परिणाम झाला, असे म्हणण्यास वाव होता. प्रयोगशाळेतील चाचण्यांशिवाय असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.>सोनेचांदीचे दागिने काळे पडत आहेत. केवळ मूर्तीच काळी पडलेली नाही. प्रदूषणामुळेच हे होत आहे. - विद्या यादव,गृहिणी, दावडी

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव