शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रेल्वे स्थानकांबाहेर स्टॅण्डवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे एक प्रकारे बकाली आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रेल्वे स्थानकांबाहेर स्टॅण्डवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे एक प्रकारे बकाली आली आहे. यातील बहुतांश स्टॅण्ड हे बेकायदा असून, ते वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने ते हटवावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे कल्याण आरटीओने दोन्ही शहरांमधील रिक्षा स्टॅण्डचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष समिती नेमली आहे. याआधीदेखील शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण होऊन अहवालही सादर झाला. पण ठोस कृतीविना तो कागदावरच राहिला आहे. त्यामुळे यंदा तरी सर्वेक्षणाअंती अंमलबजावणी होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली २२ मार्चला बैठक झाली होती. यात मनपा क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने आरटीओ विभागातील मोटार वाहन निरीक्षक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, केडीएमसीचे अधिकारी, केडीएमटीचे प्रतिनिधी, रिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी आदींची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीला रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्डचे संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हा अहवाल १२ एप्रिलला दिला जाणार होता. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही. दरम्यान, आता २७ सप्टेंबरला सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.

कल्याण आरटीओचे प्रमुख अधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यात समितीने रिक्षा, टॅक्सी शेअर व मीटरप्रमाणे पार्किंग करण्याच्या क्षमतेसह तसेच शहर बस वाहतुकीचे थांबे निश्चित करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, २०१५ मध्ये तत्कालीन आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या कार्यकाळातही स्टॅण्डचे सर्वेक्षण झाले होता, पण अहवालावर कृती झाली नाही. त्यामुळे यंदा तरी सर्वेक्षण फार्स न ठरता ठोस अंमलबजावणी होते का, याकडे लक्ष लागले आहे.

-----------------------------

बेकायदा स्टॅण्ड हटतील का?

डोंबिवली पूर्व-पश्चिमेत १५ हून अधिक रिक्षा स्टॅण्ड स्थानक परिसरात आहेत. कल्याणचे ही चित्र काही वेगळे नाही. यातील बहुतांश स्टॅण्ड बेकायदा आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाअंती या बेकायदा स्टॅण्डवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

----------------------

‘स्टॅण्डही वाढणे गरजेचे आहे’

परवाना वाटपाच्या खुल्या धोरणामुळे दोन्ही शहरांमध्ये रिक्षांची संख्या वाढली आहे. याचा फटका व्यवसायालाही बसला आहे. स्टॅण्डचे सर्वेक्षण ही काळाची गरज आहे. परंतु रिक्षांची संख्याही वाढल्याने स्टॅण्डची संख्याही वाढवणे आवश्यक आहे. याआधीही सर्वेक्षण झाले होते. परंतु, त्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या वेळेला तर केवळ दिखावा असू नये, ठोस कृती व्हावी.

- शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षाचालक-मालक युनियन

-------------------