शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रेल्वे स्थानकांबाहेर स्टॅण्डवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे एक प्रकारे बकाली आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रेल्वे स्थानकांबाहेर स्टॅण्डवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे एक प्रकारे बकाली आली आहे. यातील बहुतांश स्टॅण्ड हे बेकायदा असून, ते वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने ते हटवावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे कल्याण आरटीओने दोन्ही शहरांमधील रिक्षा स्टॅण्डचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष समिती नेमली आहे. याआधीदेखील शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण होऊन अहवालही सादर झाला. पण ठोस कृतीविना तो कागदावरच राहिला आहे. त्यामुळे यंदा तरी सर्वेक्षणाअंती अंमलबजावणी होणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली २२ मार्चला बैठक झाली होती. यात मनपा क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने आरटीओ विभागातील मोटार वाहन निरीक्षक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, केडीएमसीचे अधिकारी, केडीएमटीचे प्रतिनिधी, रिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी आदींची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीला रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्डचे संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हा अहवाल १२ एप्रिलला दिला जाणार होता. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही. दरम्यान, आता २७ सप्टेंबरला सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे.

कल्याण आरटीओचे प्रमुख अधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यात समितीने रिक्षा, टॅक्सी शेअर व मीटरप्रमाणे पार्किंग करण्याच्या क्षमतेसह तसेच शहर बस वाहतुकीचे थांबे निश्चित करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, २०१५ मध्ये तत्कालीन आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या कार्यकाळातही स्टॅण्डचे सर्वेक्षण झाले होता, पण अहवालावर कृती झाली नाही. त्यामुळे यंदा तरी सर्वेक्षण फार्स न ठरता ठोस अंमलबजावणी होते का, याकडे लक्ष लागले आहे.

-----------------------------

बेकायदा स्टॅण्ड हटतील का?

डोंबिवली पूर्व-पश्चिमेत १५ हून अधिक रिक्षा स्टॅण्ड स्थानक परिसरात आहेत. कल्याणचे ही चित्र काही वेगळे नाही. यातील बहुतांश स्टॅण्ड बेकायदा आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाअंती या बेकायदा स्टॅण्डवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

----------------------

‘स्टॅण्डही वाढणे गरजेचे आहे’

परवाना वाटपाच्या खुल्या धोरणामुळे दोन्ही शहरांमध्ये रिक्षांची संख्या वाढली आहे. याचा फटका व्यवसायालाही बसला आहे. स्टॅण्डचे सर्वेक्षण ही काळाची गरज आहे. परंतु रिक्षांची संख्याही वाढल्याने स्टॅण्डची संख्याही वाढवणे आवश्यक आहे. याआधीही सर्वेक्षण झाले होते. परंतु, त्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या वेळेला तर केवळ दिखावा असू नये, ठोस कृती व्हावी.

- शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षाचालक-मालक युनियन

-------------------