शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 1, 2017 06:17 IST

टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी

ठाणे : टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी जुन्या बस रस्त्यावर धावण्याचे प्रमाण मात्र वेगाने कमी होऊ लागले आहे. परिवहनच्या तफ्यात ३१७ बसपैकी प्रत्यक्षात २०० च्या आसपासरस्त्यावर धावत असून त्यादेखील कमी उत्पन्न देणाऱ्या मार्गावर धावत आहेत. त्यातही आता त्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून रोज ४० ते ४५ बस ब्रेकडाऊन होत आहेत. त्यामुळे परिवहनचा पाय आणखी खोलात रूतूतअसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या बसवरच आता परिवहनची आर्थिक नाडी अवलंबून राहणार असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. आजतर रस्त्यावर तुरळक बस धावत असल्याचे चित्र आहे. असे असतांना त्या बंद पडण्याचे प्रमाणही मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजघडीला रोज निघणाऱ्या २०० ते २१० पैकी ४० ते ४५ बस या ब्रेक डाऊन होत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हा गाडा सुधारण्यासाठी परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात पालिकेकडून कोट्यवधींचे अनुदान मागितले आहे. परंतु, ही सेवाही ठेकेदाराच्या बसेसवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. ठेकेदाराच्या बस वेळेवर निघत असून परिवहनच्या बसचे वेळापत्रक हे आजही कोलमडलेले आहे. घोडबंदरच्या रहिवांशाना ठेकेदाराच्या बसचा फायदा होत असला तरीदेखील शहरातील इतर मार्गांवरील प्रवाशांना परिवहनच्या जुन्या बसचा आधार असल्याने त्यांना आजही बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागवे लागत आहे. त्यात आता ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले असतांना त्यावर किरकोळ मुलामा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान दुसरीकडे बसची संख्या कमी होत असतांना परिवहनचे उत्पन्न मात्र २५ लाखांच्या घरात गेले, ही जमेची बाजू असली तरी यातील अर्धे उत्पन्न हे ठेकेदारांच्याच बसपोटी मिळत असल्याचे सूत्र सांगतात. (प्रतिनिधी)परिवहनची आर्थिक नाडी ठेकेदाराकडे?ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. येत्या काळात परिवहनची आर्थिक नाडीदेखील ठेकेदाराकडे जाणार असल्याचेच चित्र यातून पुढे आले आहे.