शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

एनआरसीला झुकते माप देणे राठोड यांना भोवले

By admin | Updated: December 4, 2015 00:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळला होता. त्या काळात एनआरसी कंपनीची जागा विक्रीसाठी ना-हरकत दाखला देणे आणि बीएसयूपीअंतर्गत बांधणाऱ्या कंत्राटदारांना झुकते माप दिल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत आंबिवली, मोहने येथे असलेली एनआरसी कंपनी बंद पडली. आर्थिक कारण देऊन कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी घोषित केली. ती नोव्हेंबर २००९ साली झाली. त्या वेळी कामगारांनी मोर्चे, आंदोलने केली. तसेच थकीत देणी दिल्याशिवाय मालकाने कंपनीची जागा विकू नये, अशी मागणी केली होती. कंपनी व्यवस्थापनाने जागाविक्रीचे व्यवहार मुंबईतील एका बड्या बिल्डरकडे केले होते. त्याचे टोकनही घेतल्याची जोरदार चर्चा त्या वेळी होती. कंपनी महापालिकेकडे मालमत्ताकर भरत होती. जोपर्यंत कामगारांची थकीत देणी दिली जात नाही, तोपर्यंत कंपनी मालकास जागाविक्रीसाठी महापालिकेने ना-हरकत दाखला देऊ नये. असे असतानाही त्या वेळी आयुक्त राठोड यांनी कंपनीमालकास ना-हरकत दाखला दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. तसेच हे प्रकरण महापालिकेच्या महासभेत जून, जुलै महिन्यांत पार पडलेल्या महासभेत चर्चिले गेले होेते. तत्कालीन कामगारमंत्री नवाब मलिक व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाचीही त्यांनी पायमल्ली केल्याचा आरोप कामगारांनी केला होता. संबंधित वृत्त/२ एनआरसी कंपनीच्या ना-हरकत दाखल्यासोबतच केंद्र सरकारने महापालिका हद्दीत शहरी गरिबांसाठी असलेल्या बीएसयूपी घर योजनेसाठी १३ हजार ८८४ घरे बांधणार होती. या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदारांना देण्यात येणारा मोबिलाइज अ‍ॅडव्हान्स जास्त प्रमाणात दिल्याचा आरोप होता. या योजनेची चौकशी म्हाडा, तत्कालीन मुख्यमंत्री व आर्थिक गुन्हे शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या सगळ्या मुद्यांवर आधारित तत्कालीन उपमहापौर व सध्याचे विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात विविध मुद्दे त्यांनी मांडले होते. सरकारने त्यांच्या निलंबनाच्या कारणात पवार यांच्या याचिकेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर राठोड काही काळ अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्या ठिकाणीही काही कामात अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.