शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीला झुकते माप देणे राठोड यांना भोवले

By admin | Updated: December 4, 2015 00:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळला होता. त्या काळात एनआरसी कंपनीची जागा विक्रीसाठी ना-हरकत दाखला देणे आणि बीएसयूपीअंतर्गत बांधणाऱ्या कंत्राटदारांना झुकते माप दिल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत आंबिवली, मोहने येथे असलेली एनआरसी कंपनी बंद पडली. आर्थिक कारण देऊन कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी घोषित केली. ती नोव्हेंबर २००९ साली झाली. त्या वेळी कामगारांनी मोर्चे, आंदोलने केली. तसेच थकीत देणी दिल्याशिवाय मालकाने कंपनीची जागा विकू नये, अशी मागणी केली होती. कंपनी व्यवस्थापनाने जागाविक्रीचे व्यवहार मुंबईतील एका बड्या बिल्डरकडे केले होते. त्याचे टोकनही घेतल्याची जोरदार चर्चा त्या वेळी होती. कंपनी महापालिकेकडे मालमत्ताकर भरत होती. जोपर्यंत कामगारांची थकीत देणी दिली जात नाही, तोपर्यंत कंपनी मालकास जागाविक्रीसाठी महापालिकेने ना-हरकत दाखला देऊ नये. असे असतानाही त्या वेळी आयुक्त राठोड यांनी कंपनीमालकास ना-हरकत दाखला दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. तसेच हे प्रकरण महापालिकेच्या महासभेत जून, जुलै महिन्यांत पार पडलेल्या महासभेत चर्चिले गेले होेते. तत्कालीन कामगारमंत्री नवाब मलिक व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाचीही त्यांनी पायमल्ली केल्याचा आरोप कामगारांनी केला होता. संबंधित वृत्त/२ एनआरसी कंपनीच्या ना-हरकत दाखल्यासोबतच केंद्र सरकारने महापालिका हद्दीत शहरी गरिबांसाठी असलेल्या बीएसयूपी घर योजनेसाठी १३ हजार ८८४ घरे बांधणार होती. या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदारांना देण्यात येणारा मोबिलाइज अ‍ॅडव्हान्स जास्त प्रमाणात दिल्याचा आरोप होता. या योजनेची चौकशी म्हाडा, तत्कालीन मुख्यमंत्री व आर्थिक गुन्हे शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या सगळ्या मुद्यांवर आधारित तत्कालीन उपमहापौर व सध्याचे विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात विविध मुद्दे त्यांनी मांडले होते. सरकारने त्यांच्या निलंबनाच्या कारणात पवार यांच्या याचिकेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर राठोड काही काळ अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्या ठिकाणीही काही कामात अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.