शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

निराधार महिलांच्या अर्थसाहाय्यात लवकरच वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:55 IST

३० ते १०० टक्के वाढ प्रस्तावित: महासभेसमोर येणार प्रस्ताव

मीरा राड / भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरांतील विधवा व घटस्फोटित महिलांना त्यांच्या मुलींच्या विवाहासह मुलांच्या शिक्षणासाठी पालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात सुमारे ३० ते १०० टक्क्यांची भरीव वाढ होणार असून तसा प्रस्ताव १९ जानेवारीच्या महासभेत मांडला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत या अर्थसाहाय्यात दुसºयांदा वाढ करण्यात येत आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असली, तरी महासभेच्या मंजुरीनंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीने सुरुवातीला निराधार महिलांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी १२ हजार रुपये, मुलांच्या पहिली ते पाचवीच्या शिक्षणासाठी तीन हजार रुपये, सहावी ते आठवीसाठी चार हजार रुपये, नववी ते बारावीसाठी सहा हजार रुपये व बारावी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी आठ हजार रुपये वार्षिक अर्थसाहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

त्यावर महासभेने शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, वाढती महागाई पाहता ३० आॅगस्ट २०१६ रोजी समितीच्या बैठकीत त्यावेळच्या अर्थसाहाय्यात सुमारे २५ ते ६५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मुलींच्या विवाहासाठी १२ हून १७ हजार रुपये आणि मुलांच्या शिक्षणासाठी इयत्तानिहाय प्रत्येकी दोन हजार रुपयांचे वाढीव अर्थसाहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. त्याला २९ सप्टेंबर २०१६ रोजीच्या महासभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर, पुन्हा महागाईचे कारण पुढे करून अर्थसाहाय्यात वाढ करण्याची शिफारस महिला व बालकल्याण समितीने १९ जानेवारीच्या महासभेकडे केली आहे. त्यात सध्या मिळणाºया अर्थसाहाय्यात ३० ते १०० टक्के वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसा ठरावच ६ सप्टेंबर २०१८ रोजी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यात निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी १७ हून २१ हजार रुपये, मुलांच्या शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पाचऐवजी सात हजार रुपये, सहावी ते आठवीसाठी सहाऐवजी १० हजार रुपये, नववी ते बारावीसाठी आठऐवजी १२ हजार रुपये, बारावीनंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी १० ऐवजी १५ हजार रुपये वाढीव अर्थसाहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

समितीचा हा ठराव येत्या १९ जानेवारीच्या महासभेत अंतिम मान्यतेसाठी मांडला जाणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यास पूर्वीप्रमाणेच आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांना पालिकेकडे जमा करावी लागणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर होते आहे वाढ; पुन्हा चुनावी जुमला?समितीच्या बैठकीत मंजूर होणाºया ठरावांच्या अंमलबजावणीसाठी त्याला आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळावी, याकरिता तो महासभेपुढे सादर केला जातो. यात वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याने योजना प्रभावीपणे राबवता येत नाही.त्यामुळेच या वाढीव अर्थसाहाय्याचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर केला जाणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा अर्थसाहाय्यात वाढ करत असून तो केवळ निवडणुकीचाच जुमला ठरणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.परिणामी, समितीच्या बैठकीतील निर्णयाला महत्त्व ठरत नसल्याने महाराष्टÑ महापालिका अधिनियमांतर्गत समितीला सर्व प्रस्तावांसह आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावांवर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा, असा ठराव ३० आॅगस्ट २०१६ रोजी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. तो २९ सप्टेंबर २०१६ रोजीच्या महासभेत सादर केला असता त्याला अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही.