शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नागरिक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:32 IST

दोघांना अटक : आरोपींविरोधात रात्री उशिरा नागरिक उतरले रस्त्यावर

भिवंडी : साेळावर्षीय मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, पीडित मुलगी व आरोपी हे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याने ही घटना समजताच नागरिकांनी मंगळवारी रात्री उशिरा रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भिवंडी पोलिसांनी वातावरण शांत केले.

भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाणे क्षेत्रातील एक चाळीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अपहृत मुलगी अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तीन पथके बनवून तपास सुरू केला. पीडितेच्या पालकांकडे चौकशी केली असता सुशीलकुमार संतोष सोनी (वय २८, रा. हंडी कम्पाउंंड) व इरशाद इलियास अन्सारी (वय ४८, रा. दिवाणशाह दर्गा) या दोन पानपट्टीचालक असलेल्या संशयितांची नावे समोर आली. पोलिसांनी मंगळवारी दोघांची चौकशी केली असता सुशीलकुमार सोनी याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ (जे) सह पोक्सोअन्वयेही गुन्हा दाखल केला.

जनक्षोभ उसळला : आराेपीच्या पानपट्टीची नागरिकांकडून तोडफोडआरोपी व पीडित मुलगी हे वेगवेगळ्या धर्मांचे असल्याचे समजताच परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीची दिवाणशाह दर्गा परिसरातील पानपट्टीची तोडफोड केली. त्यानंतर, निजामपुरा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय आवारातील पोलीस कोठडीत ठेवलेल्या आरोपींना आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी रात्री उशिरा नागिरकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. n कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना या घटनेस वेगळा रंग न देता शांतता राखण्याचे आवाहन केले. दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एन.पी. पवार करीत आहेत.

बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी

भिवंडी : भिवंडीतील अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची, तसेच निकाल सहा महिन्यांच्या आत देऊन पीडितेस न्याय देण्याची मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. n पीडित मुलीचे पालक हे आरोपींच्या दहशतीखाली असल्याने त्यांना संरक्षण देण्यात यावे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि केंद्र तसेच राज्य शासनाच्या संबंधित योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.n गृहमंत्र्यांनी गृह विभागाचे उपसचिव व ठाणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती रईस शेख यांनी दिली

टॅग्स :thaneठाणेRapeबलात्कार