शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चेहरे रंगवत साजरी झाली रंगपंचमी, स्वत्वचे अनोखे सेलिब्रेशन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 25, 2024 18:05 IST

तीन तरुण कवींनी सुंदर मराठी कविता सादर केल्या ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

ठाणे : एकीकडे आबालवृद्ध ठाणेकर चक्क रांगा लावून कलाकारांकडून त्यांना हवे तसे चेहरे रंगवून घेत होते, सोबत कराओके, कविता, कॉमेडी, ड्रमिंग याचे सादरीकरण व एकूण उत्साहाच्या आनंदाच्या आणि तरीही बिलकुल बीभत्स, ओंगळ प्रकार नसलेल्या वातावरणात रंगपंचमी साजरी झाली. यंदा सलग पाचव्या वर्षी स्वत्व ठाणे व उत्सव ठाणे आणि इतर संस्थानी मिळून एक अनोखी होळी हा उपक्रम कचराळी तलाव येथील खुल्या रंगमंचाच्या परिसरात राबविला. 

सकाळी ८ वा. चेहरे रंगविण्याची व्यवस्था, इतर कार्यक्रमाना बसायची व्यवस्था अशी जय्यत तयारी होती. लोक येऊ लागताच स्वत्वचे कलाकार त्यांचे चेहरे कलात्मक प्रकारे रंगवून देत होते. बाजूला स्वत्व ड्रम सर्कलचे ड्रम वादन सुरु असल्याने लोक रंगविलेल्या चेहऱ्यांनी नाचू लागत. अक्षय जाधव यांच्या ए के लाइव्ह बँडची गाणी सुरु झाली. लोकांची चेहरे रंगवून घ्यायला रीघ लागली. बँडनंतर अथर्व हिंगणे आणि चार कलाकारांनी स्टँड अप कॉमेडी सादर केली. यात ठाण्यातील जुने नागरिक डॅनियल यांचाही सहभाग होता. त्यानंतर तीन तरुण कवींनी सुंदर मराठी कविता सादर केल्या ज्याला प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. 

मूळ नेपाळचे असलेले ठाणेकर विनोद शर्मा यांनी अस्सल आगरी भाषेतील सादर केलेल आगरी रामायण प्रेक्षकांनी उचलून धरले. ज्येष्ठ तबलावादक पं. मुकुंदराज देव. कत्थक गुरु मंजिरी देव, बनारस घराण्याचे कथक कलाकार सौरव मिश्रा, चित्रकार निकम असे कलाकार या कार्यक्रमाला आवर्जून ऊपस्थित होते, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  अहिवर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि सीए संजीव ब्रह्मे, रिस्पॉन्सिबल नेटिझन्सचे उन्मेष जोशी, रोटरियन श्याम माडीवाले, वयमचे राजेंद्र गोसावी असे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी आपले चेहरे रंगवून घेतले. यावेळी राजेश मोरे, रुचिता मोरे हे देखील उपस्थित होते. “आम्ही ही अनोखी होळी सध्या होणाऱ्या प्रकारांना एक सशक्त पर्याय म्हणून साजरी करीत आहोत दरवर्षी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. असे कार्यक्रम इतर शहरात व गवात सुद्धा व्हावे आणि परंपरेसोबत वेगळ्या संकल्पनांची सांगड घालावी हा स्वत्व ठाणे आणि उत्सव ठाणे च्या विचारांचा गाभा आहे “असे मत श्रीपाद भालेराव यांनी व्यक्त केले. शेवटी सर्वानी “जय जय महाराष्ट्र माझा” म्हटले व कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :thaneठाणे