शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

By admin | Updated: January 9, 2016 02:10 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा सुरु असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाला व विकासाला आयुक्त ई रवींद्रन यांनी विशेष प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यास शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ झाला. कडक पोलीस बंदोबस्त याकरिता तैनात केला होता. कारण या कारवाईला व्यापाऱ्यांनी सक्त विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता धावून आले होते व त्यांनी अशी कारवाई होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक दुपारनंतर पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला व कारवाई थांबली. कारवाई थांबली असली तरी ८० टक्के पाडकाम झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून काही बांधकाम पाडण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबली, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.इमारती, दुकाने अशा ३१२ जणांना त्यांचे बांधकाम पाडून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यात मोठया प्रमाणावर व्यापाऱ्यांची बांधकामे होती. त्यांनी हे रूंदीकरण थांबावे म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवली आणि निषेध प्रकट केला. त्याचवेळी मंत्री मेहता हे व्यापाऱ्यांना भेट द्यायला आले. स्मार्ट सिटी लोकांकरिता आहे की, अधिकाऱ्यांकरिता असा सवाल मेहता यांनी करीत. कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.आयुक्त रवींद्रन हे कारवाईवर ठाम होते. त्यांनी दबावाला बळी न पडता शुक्रवारी सकाळपासूनच ४ जेसीबी, ३ पोकलेन, २०० पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी, आठ प्रभागक्षेत्र अधिकारी असा मोठा फौजफाटा कारवाईसाठी तैनात केला होता. व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करु नये याकरिता शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई होणारच हे स्पष्ट झाल्याने काही व्यापाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच आपली वाढीव बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरूवात केली होती. आम्हाला रुंद रस्ते हवे अशी भूमिका पादचारी व वाहन चालक यांनी घेत आयुक्तांच्या या कारवाईचे कौतुक केले. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई थांबविण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्त रवींद्रन यांना दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा आहे. नगरविकास व गृह ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांच्या कार्यालयाखेरीज हे घडले नाही, असे बोलले जाते. प्रकाश मेहता यांनी कल्याणमधील कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ती थांबली, असेही बोलले जाते.