शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

"राम मंदिरामुळे 'भारत' जगाचा मार्गदर्शक"

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 11, 2024 14:08 IST

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन

ठाणे : छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन यंदा साजरा होत आहे, त्याचवर्षी अयोध्येत ४९६ वर्षानी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एकप्रकारे शिवरायांना आदरांजली असून २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. तेव्हा, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतिक हे राममंदिर असणार आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक,  शिवभक्त मोहन शेटे यांनी केले.

ठाण्यात सुरू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "शिवरायांचा आठवावा प्रताप" हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.

आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा श्रोत्यांसमोर उलगडताना ६ जून १६७४ च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विषद केले.शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सर्वभौमत्व होते. याच शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे झाले, हीच शिवरायांना खरी आदरांजली असुन बाबराचा एक कलंक पुसला जात आहे.२२ जाने. रोजी लोकार्पण होणारे राम मंदिर केवळ दगडाची वास्तु नाही तर, परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा ५० वर्षाचा काळ युगप्रवर्तक होता, ज्याचे परिणाम पुढील १०० ते १५० वर्षे दिसले. त्याचप्रमाणे २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्याने संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचे बघायला मिळणार आहे. किंबहुना, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे, याचे प्रतिक हे राम मंदिर असल्याचे शेटे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे