शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"राम मंदिरामुळे 'भारत' जगाचा मार्गदर्शक"

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 11, 2024 14:08 IST

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन

ठाणे : छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन यंदा साजरा होत आहे, त्याचवर्षी अयोध्येत ४९६ वर्षानी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एकप्रकारे शिवरायांना आदरांजली असून २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. तेव्हा, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतिक हे राममंदिर असणार आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक,  शिवभक्त मोहन शेटे यांनी केले.

ठाण्यात सुरू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "शिवरायांचा आठवावा प्रताप" हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.

आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा श्रोत्यांसमोर उलगडताना ६ जून १६७४ च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विषद केले.शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सर्वभौमत्व होते. याच शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे झाले, हीच शिवरायांना खरी आदरांजली असुन बाबराचा एक कलंक पुसला जात आहे.२२ जाने. रोजी लोकार्पण होणारे राम मंदिर केवळ दगडाची वास्तु नाही तर, परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा ५० वर्षाचा काळ युगप्रवर्तक होता, ज्याचे परिणाम पुढील १०० ते १५० वर्षे दिसले. त्याचप्रमाणे २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्याने संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचे बघायला मिळणार आहे. किंबहुना, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे, याचे प्रतिक हे राम मंदिर असल्याचे शेटे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे