शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

गर्दीच्या ‘सुरक्षे’साठी रिक्षांच्या परवाने जप्तीची सक्ती!

By admin | Updated: January 10, 2017 06:45 IST

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये

ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये आॅटोरिक्षाचालकांनी हजर राहावे, यासाठी त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने पोलिसांनी अगोदरच जमा केले होते. पोलिसांच्या या अभिनव सक्तीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला. परंतु, त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसलेल्या आॅटोचालकांनी नाराजी व्यक्त केली.भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल रावदेव यांच्या उपस्थितीत माझी रिक्षा, माझी दीक्षा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी १ वाजताची असली तरी आॅटोचालकांना १२ वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी हजर राहावे, याचे नियोजन वाहतूक शाखेने अगोदरच केले होते. केवळ तोंडी सांगून आॅटोचालक कार्यक्रमाला येणार नाहीत, हे वाहतूक पोलिसांनी हेरले होते. त्यावर उपाय म्हणून त्यांचे परवाने स्वत:च्या ताब्यात घेण्याचा कार्यक्रम वाहतूक पोलीस गेल्या काही दिवसांपासून राबवत होते. कार्यक्रमाला या आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर परवाने घेऊन जा, असे त्यांना बजावण्यात आले होते. परवाने जमा करण्याचा हा कार्यक्रम किती प्रामाणिकपणे राबवण्यात आला, हे आॅटोचालकांच्या उपस्थितीवरून दिसून आले. कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप आॅटोचालकांनी हाऊसफुल्ल झाला होता. जवळपास २०० चालक कार्यक्रमासाठी रिक्षा घेऊन हजर होते. कार्यक्रम आॅटोरिक्षाचालकांच्या हिताचाच होता. सामान्य नागरिकांना आॅटोरिक्षाचालकांकडून बरेचदा चांगले अनुभव येत नाहीत. जवळच्या भाड्यासाठी नकार देणे, शहराची माहिती नसलेल्या प्रवाशांना जाणीवपूर्वक लांबच्या रस्त्याने नेणे, रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, असे प्रकार नेहमीच घडतात. वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात आघाडीवर कोण, या प्रश्नावर मत जाणूस घेतल्यास सर्वाधिक ठाणेकर आॅटोचालकांनाच दोष देतील, यात शंका नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून आॅटोचालकांचे वेळोवेळी प्रबोधन होणे अत्यावश्यक असते, यातही शंका नाही. कार्यक्रमासाठी त्यांचे परवाने जमा करण्यामागे वाहतूक पोलिसांचा उद्देश वाईट नव्हता, हेही खरे. परंतु, असे कार्यक्रम प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरतात, हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. (प्रतिनिधी)