शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राखी पौर्णिमेमुळे एसटींची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने बस प्रवासाला १०० टक्के क्षमतेने प्रवासाची मुभा आहे. त्याचबरोबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने बस प्रवासाला १०० टक्के क्षमतेने प्रवासाची मुभा आहे. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वे प्रवासी गाड्यांमधून दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे रेल्वे आणि बसची सेवा बहुतांश सुरू आहे. त्याचा फायदा भाऊ-बहिणीला होणार आहे. कोरोनाकाळात त्यांना प्रवास करून एकमेकांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करता येणार आहे.

कल्याणहून एसटीसह रेल्वे प्रवासाकरिता लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या जंक्शनवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची मोठी मदार आहे. कल्याण एसटी डेपोतून दररोज ६० बस चालविल्या जातात.

-------------------------------------

या मार्गांवर वाढल्या फेऱ्या

कल्याण-पुणे

कल्याण-अलिबाग

कल्याण-नाशिक

कल्याण-अहमदनगर

कल्याण-पनवेल

-------------------------------------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

सध्या दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्यापूर्वी अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवासास दोन डोसची सक्ती नाही. त्यामुळे पुणे, नाशिक, मनमाड, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड या गाड्या सुरू आहेत.

-------------------------------------

प्रवाशांची गर्दी

निर्बंध शिथिल केल्याने कल्याण-पनवेल, कल्याण-भिवंडी, कल्याण-वाडा, कल्याण-मुरबाड या मार्गांवर गर्दी आहे. कारण भिवंडी, वाडा, मुरबाडकडे रेल्वे नाही. तर पनवेल आणि नवी मुंबई, ठाण्याला जाण्यासाठी रेल्वेची मुभा असली तरी दोन डोसची अट पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या प्रवासाची मदार एसटीवरच आहे.

--------------------------------------

कल्याण बस डेपोतून सध्या एकूण ६० बस चालविल्या जात आहेत. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. राखी पौर्णिमेला शनिवारी सकाळपासून जादा बस सोडल्या जाणार आहेत. किमान १० जादा बसचे नियोजन आहे. दहा दिवसांपूर्वी साडेपाच लाख रुपये उत्पन्न होते. आता ते साडेसहा लाख झाले आहे.

- विजय गायकवाड, बस डेपो व्यवस्थापक, कल्याण.

--------------------------------------