शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

By पंकज पाटील | Updated: August 26, 2023 18:42 IST

Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

- पंकज पाटील

अंबरनाथ -  'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालय हे नित्य नवीन उपक्रमांसाठी ओळखले जाते. या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी चे विद्यार्थी यावर्षी सुमारे महिनाभर एका वेगळ्या धाग्याने एकमेकांशी जोडले गेले होते. हा बंध होता राखी बनवणे या उपक्रमाचा! स्वतः एखादी वस्तू बनवण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने उपभोगला. तीन ते साडेतीन हजार राख्या स्वतः तयार केल्या. सीमेवर अहोरात्र तैनात असणारा सैनिक सण समारंभाच्या निमित्ताने आपल्या घरी येऊ शकत नाही, पण त्याच्याप्रती कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. ती व्यक्त करण्यासाठी यातील 55 राख्या जवानांना पाठवण्यात आल्या. यात नौदल प्रमुखांचाही समावेश आहे.अंबरनाथ मधील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ या सर्व विभागात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा आपल्यासाठीच काम करत असतात, त्या सर्वांना विद्यालयातील विद्यार्थिनी राखी बांधणार आहेत. यातून समाज व प्रशासन यांच्यात एक सुरेख नाते तयार व्हायला मदत होणार आहे.

उपक्रमासाठी विद्यालयातील जान्हवी जागरे, सारिका कान्हेरकर, सुरेखा शिंदे, मनीषा गवारी, भरत आवारे, संजय चंदन, विजय विरणक, विनायक बारे हे शिक्षक , तसेच प्राची नेतनराव, पूर्वा गायकवाड, कोमल गुंजाळ, आदिती अढांगळे देवकी तुपदोर,आदिती जांभळे या विद्यार्थिनींच्या मदतीने राख्या बनवल्या गेल्या. मुख्याध्यापक संतोष भणगे , पदाधिकारी नयना गुळीक, सुरेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या हा उपक्रम करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शाळेने जपलेली सामाजिक बांधिलकी महत्वपूर्ण ठरत आहे. 

टॅग्स :thaneठाणेRaksha Bandhanरक्षाबंधनambernathअंबरनाथ