शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

By पंकज पाटील | Updated: August 26, 2023 18:42 IST

Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

- पंकज पाटील

अंबरनाथ -  'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालय हे नित्य नवीन उपक्रमांसाठी ओळखले जाते. या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी चे विद्यार्थी यावर्षी सुमारे महिनाभर एका वेगळ्या धाग्याने एकमेकांशी जोडले गेले होते. हा बंध होता राखी बनवणे या उपक्रमाचा! स्वतः एखादी वस्तू बनवण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने उपभोगला. तीन ते साडेतीन हजार राख्या स्वतः तयार केल्या. सीमेवर अहोरात्र तैनात असणारा सैनिक सण समारंभाच्या निमित्ताने आपल्या घरी येऊ शकत नाही, पण त्याच्याप्रती कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. ती व्यक्त करण्यासाठी यातील 55 राख्या जवानांना पाठवण्यात आल्या. यात नौदल प्रमुखांचाही समावेश आहे.अंबरनाथ मधील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ या सर्व विभागात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा आपल्यासाठीच काम करत असतात, त्या सर्वांना विद्यालयातील विद्यार्थिनी राखी बांधणार आहेत. यातून समाज व प्रशासन यांच्यात एक सुरेख नाते तयार व्हायला मदत होणार आहे.

उपक्रमासाठी विद्यालयातील जान्हवी जागरे, सारिका कान्हेरकर, सुरेखा शिंदे, मनीषा गवारी, भरत आवारे, संजय चंदन, विजय विरणक, विनायक बारे हे शिक्षक , तसेच प्राची नेतनराव, पूर्वा गायकवाड, कोमल गुंजाळ, आदिती अढांगळे देवकी तुपदोर,आदिती जांभळे या विद्यार्थिनींच्या मदतीने राख्या बनवल्या गेल्या. मुख्याध्यापक संतोष भणगे , पदाधिकारी नयना गुळीक, सुरेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या हा उपक्रम करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शाळेने जपलेली सामाजिक बांधिलकी महत्वपूर्ण ठरत आहे. 

टॅग्स :thaneठाणेRaksha Bandhanरक्षाबंधनambernathअंबरनाथ