शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

By पंकज पाटील | Updated: August 26, 2023 18:42 IST

Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

- पंकज पाटील

अंबरनाथ -  'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.

दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालय हे नित्य नवीन उपक्रमांसाठी ओळखले जाते. या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी चे विद्यार्थी यावर्षी सुमारे महिनाभर एका वेगळ्या धाग्याने एकमेकांशी जोडले गेले होते. हा बंध होता राखी बनवणे या उपक्रमाचा! स्वतः एखादी वस्तू बनवण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने उपभोगला. तीन ते साडेतीन हजार राख्या स्वतः तयार केल्या. सीमेवर अहोरात्र तैनात असणारा सैनिक सण समारंभाच्या निमित्ताने आपल्या घरी येऊ शकत नाही, पण त्याच्याप्रती कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. ती व्यक्त करण्यासाठी यातील 55 राख्या जवानांना पाठवण्यात आल्या. यात नौदल प्रमुखांचाही समावेश आहे.अंबरनाथ मधील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ या सर्व विभागात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा आपल्यासाठीच काम करत असतात, त्या सर्वांना विद्यालयातील विद्यार्थिनी राखी बांधणार आहेत. यातून समाज व प्रशासन यांच्यात एक सुरेख नाते तयार व्हायला मदत होणार आहे.

उपक्रमासाठी विद्यालयातील जान्हवी जागरे, सारिका कान्हेरकर, सुरेखा शिंदे, मनीषा गवारी, भरत आवारे, संजय चंदन, विजय विरणक, विनायक बारे हे शिक्षक , तसेच प्राची नेतनराव, पूर्वा गायकवाड, कोमल गुंजाळ, आदिती अढांगळे देवकी तुपदोर,आदिती जांभळे या विद्यार्थिनींच्या मदतीने राख्या बनवल्या गेल्या. मुख्याध्यापक संतोष भणगे , पदाधिकारी नयना गुळीक, सुरेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या हा उपक्रम करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शाळेने जपलेली सामाजिक बांधिलकी महत्वपूर्ण ठरत आहे. 

टॅग्स :thaneठाणेRaksha Bandhanरक्षाबंधनambernathअंबरनाथ