शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर जामिनावर झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:21 IST

बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली.

ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली. मात्र, त्यांनी कारागृहामध्येही हेरगिरी सुरूच ठेवली. कैद्यांचे हाल, त्यांचे उपेक्षित आयुष्य आणि त्यामागची कारणे रजनी यांनी तपासली असून, त्या लवकरच यावर पुस्तकही लिहिणार आहेत.सीडीआर प्रकरणात ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २ फेब्रुवारीला रजनी पंडित यांना अटक केली होती. जवळपास ४० दिवस त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी २० हजारांच्या जात मुचलक्यावर सोमवारी त्यांचा जामीन मंजूर केला. सकाळी १० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.कारागृहात भल्या-भल्यांचा धीर खचतो. रजनी पंडित मात्र त्याला अपवाद ठरल्या. या काळात त्यांनी महिला कैद्यांचे समुपदेशन केले. महिला कैद्यांच्या मदतीसाठी कुणीच पोहोचत नाही. प्रसारमाध्यमांकडे किंवा अन्य कुणाकडे काही बोलल्यास त्याचा परिणाम खटल्यावर होईल, अशी भीती कैद्यांना दाखविली जाते. त्यामुळे अनेक कैदी नैराश्याच्या गर्तेत सापडले असल्याचे पंडित यांनी सांगितले. सीडीआर प्रकरणाबाबत बोलताना, त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. मानसिकदृष्ट्या खचलेल्या कैद्यांचे समुपदेशन करून हा काळही आपण सत्कारणी लावला, असेही त्या म्हणाल्या.>सत्य शोधून काढणारसीडीआर प्रकरणात आपणास का गोवण्यात आले, याचे सत्य शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जवळपास ३0 वर्षांपासून खासगी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या रजनी पंडित यांनी दिला. शेवटी मी एक गुप्तहेर आहे. अनेक प्रकरणांचा छडा मी आजवर लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाचाही तळ गाठून सत्य शोधून काढू, असे पंडित यांनी सांगितले.