शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

हुकूमशाहीच्या अहंकाराविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार!

By अजित मांडके | Updated: February 19, 2024 20:11 IST

शिवजयंतीला राजन विचारांचे महाराजांना पत्र

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात विचारेंनी महाराष्ट्राची सद्यस्थितीचे उल्लेख करताना, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना नावाच्या स्वराज्य आणि पक्ष चिन्ह असलेले ' धनुष्यबाण ' स्वतःच्या स्वार्थासाठी कसे तोडले याबद्दल नमूद केले आहे. तसेच आता हुकूमशाहीच्या अहंकारविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार असे म्हटले आहे. हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार, तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. या व्हायरल झालेल्या त्या पत्राच्या साडेपाच मिनिटांच्या व्हिडिओने पुन्हा विचारेंनी भावनिक आणि मार्मिक मुद्दे मांडून योग्य पध्द्तीने भाजप- शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओच्या सुरवातीला त्यांनी महाराजानां मुजरा करत, महाराज तुमची आठवण येते असे म्हटले आहे. शिवजयंती म्हणजे शिव भक्तांसाठी दिवाळी आहे. तसेच महाराज आपण रायलेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेतली होती. तशीच शपथ आपल्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांनी घेत, शिवसेना नावाचे स्वराज घेऊन आमच्या रक्षणासाठी उभे राहिले. मात्र त्यांच्या ५८ वर्षांचे धनुष्यबाण काही मंडळींनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी तोडू टाकल्याची खंत व्यक्त केली. महाराज आपण म्हटले होते राजा कोणी ही असो पण रयत महत्वाची आहे. पण आज धर्म आणि जातीच्या नावावर त्या रयतेच्या मनात एकमेकांविषयी विष पसरवले जात आहे. पण ज्यांना हे कळते ते तुमच्या नावाने हिंदुत्वाचा गैरवापर करत आहेत. चाकू, सुऱ्या,कोयते आणि बंदूक घेऊन गुंड रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आता सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होतात, विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते, ही सत्ता रयतेच्या मनात दहशत निर्माण करीत आहे. असे म्हटले आहे.  ज्या स्वराज्यात बळीराजाला आपण मानाचे स्थान दिले होते, त्यालाच आज स्वतःच्या हक्कासाठी सरकार विरुद्ध लढावे लागत आहे. महाराज तुमचाच गनिमी कावा यांनी स्वराज्य फोडण्यासाठी केला.

आता शब्दांनाही लाज वाटावी, एवढे यांचे चारित्र्य मल्लीन झाले आहे. यांना माफी नाही महाराज, हे राज्य उलटून टाकण्याची वेळ आली आहे. आणि आज मी एकटा नाही महाराज, बाळासाहेबांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने आम्ही सर्व मावळे उतरलोय, आम्ही लढणार. सत्ता नाही इनाम महत्त्वाचा आहे,असे आपणच म्हटले होते. या हुकूमशाही विरुद्ध शिवशाहीची ही लढाई सच्चाई ची लढाई आहे. सत्याचा विजय होणार, रयतेच्या मनात जी ज्योत पेटवली आहे, ती आता वनवा होणार, क्रांतीची मशाल धगधगणार, हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार , तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. असेही विचारेंनी त्या पत्रात म्हटले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज