शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा एक महिना गेला कोरडाच, २४ टक्के पाऊस कमी

By admin | Updated: November 22, 2015 00:58 IST

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी

ठाणे : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी केवळ ८९ दिवसच पाऊस झाला असून त्यामुळे एक महिना कोरडाच गेला आहे. त्यातही २१ दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी दिली आहे. मागील तीन वर्षापासून ठाण्यात पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जात आहे. २०१३ मध्ये ठाणे ३ हजार ४२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये हे प्रमाण २ हजार ६०५ मिमी एवढे झाले. यंदा अर्थात २०१५ मध्ये या प्रमाणात आणखी तफावत झाली असून चार महिन्यात केवळ २ हजार २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या वरून राजाने नंतर पाठ फिरवली. १८ जूनला यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून या दिवशी तब्बल १७७ मिमि पाऊस पडला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी १५९ मिमि पावसाची नोंद झाली होती. जून महिन्यात सात दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस ठाणे शहरात पडून या सात दिवसातच सुमारे ६०० मिमि नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात ६९५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात २० तारखेला ११३ मिमि आणि २१ तारखेला ९८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात केवळ आठ दिवसच चांगला पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण अर्ध्यावर आले. या महिन्यात केवळ ३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या २५ तारखेला ८१ मिमी पाऊस पडला होता. तत्पूर्वी १७ तारखेला ४५ मिमी पावसाची नोंद झाली. तर इतर दिवशी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाच प्रमाण कमी होवून या महिन्यात केवळ २४८ मिमी पाऊस पडला आहे. २१ तारखेला ७२ मिमी आणि १८, १९ आणि २० तारखेला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. त्याव्यतिरिक्त अन्य दिवशी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर आॅक्टोबर हीट असतांनाही या महिन्यात २ दिवस ठाणे शहरात पाऊस पडला त्यातही केवळ ३ तारखेला ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागील तीन वर्षाच ठाणे शहारत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता, ते सरासरी कमी होत गेले आहे यंदा कमी पडलेल्या पावसाने ठाणेकरावर पाणी कपातीच संकट ओढावले आहे. आतापासूनच महापालिकेने रोज १५ टक्के पाणी कपात केली आहे. त्याशिवाय दर बुधवारी आणि शुक्र वारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. सध्याचा पाणी साठा लक्षात घेता येत्या काही महिन्यात ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.