शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

पावसाचा एक महिना गेला कोरडाच, २४ टक्के पाऊस कमी

By admin | Updated: November 22, 2015 00:58 IST

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी

ठाणे : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी केवळ ८९ दिवसच पाऊस झाला असून त्यामुळे एक महिना कोरडाच गेला आहे. त्यातही २१ दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी दिली आहे. मागील तीन वर्षापासून ठाण्यात पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जात आहे. २०१३ मध्ये ठाणे ३ हजार ४२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये हे प्रमाण २ हजार ६०५ मिमी एवढे झाले. यंदा अर्थात २०१५ मध्ये या प्रमाणात आणखी तफावत झाली असून चार महिन्यात केवळ २ हजार २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या वरून राजाने नंतर पाठ फिरवली. १८ जूनला यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून या दिवशी तब्बल १७७ मिमि पाऊस पडला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी १५९ मिमि पावसाची नोंद झाली होती. जून महिन्यात सात दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस ठाणे शहरात पडून या सात दिवसातच सुमारे ६०० मिमि नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात ६९५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात २० तारखेला ११३ मिमि आणि २१ तारखेला ९८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात केवळ आठ दिवसच चांगला पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण अर्ध्यावर आले. या महिन्यात केवळ ३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या २५ तारखेला ८१ मिमी पाऊस पडला होता. तत्पूर्वी १७ तारखेला ४५ मिमी पावसाची नोंद झाली. तर इतर दिवशी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाच प्रमाण कमी होवून या महिन्यात केवळ २४८ मिमी पाऊस पडला आहे. २१ तारखेला ७२ मिमी आणि १८, १९ आणि २० तारखेला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. त्याव्यतिरिक्त अन्य दिवशी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर आॅक्टोबर हीट असतांनाही या महिन्यात २ दिवस ठाणे शहरात पाऊस पडला त्यातही केवळ ३ तारखेला ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागील तीन वर्षाच ठाणे शहारत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता, ते सरासरी कमी होत गेले आहे यंदा कमी पडलेल्या पावसाने ठाणेकरावर पाणी कपातीच संकट ओढावले आहे. आतापासूनच महापालिकेने रोज १५ टक्के पाणी कपात केली आहे. त्याशिवाय दर बुधवारी आणि शुक्र वारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. सध्याचा पाणी साठा लक्षात घेता येत्या काही महिन्यात ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.