शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पावसाचा एक महिना गेला कोरडाच, २४ टक्के पाऊस कमी

By admin | Updated: November 22, 2015 00:58 IST

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी

ठाणे : यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यावर भिषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यंदा ठाणे शहरात चार महिने म्हणजेच १२० दिवसांपैकी केवळ ८९ दिवसच पाऊस झाला असून त्यामुळे एक महिना कोरडाच गेला आहे. त्यातही २१ दिवस पावसाने बऱ्यापैकी हजेरी दिली आहे. मागील तीन वर्षापासून ठाण्यात पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जात आहे. २०१३ मध्ये ठाणे ३ हजार ४२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये हे प्रमाण २ हजार ६०५ मिमी एवढे झाले. यंदा अर्थात २०१५ मध्ये या प्रमाणात आणखी तफावत झाली असून चार महिन्यात केवळ २ हजार २२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या वरून राजाने नंतर पाठ फिरवली. १८ जूनला यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून या दिवशी तब्बल १७७ मिमि पाऊस पडला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी १५९ मिमि पावसाची नोंद झाली होती. जून महिन्यात सात दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस ठाणे शहरात पडून या सात दिवसातच सुमारे ६०० मिमि नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात ६९५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात २० तारखेला ११३ मिमि आणि २१ तारखेला ९८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात केवळ आठ दिवसच चांगला पाऊस पडला होता. आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण अर्ध्यावर आले. या महिन्यात केवळ ३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या २५ तारखेला ८१ मिमी पाऊस पडला होता. तत्पूर्वी १७ तारखेला ४५ मिमी पावसाची नोंद झाली. तर इतर दिवशी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाच प्रमाण कमी होवून या महिन्यात केवळ २४८ मिमी पाऊस पडला आहे. २१ तारखेला ७२ मिमी आणि १८, १९ आणि २० तारखेला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. त्याव्यतिरिक्त अन्य दिवशी अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर आॅक्टोबर हीट असतांनाही या महिन्यात २ दिवस ठाणे शहरात पाऊस पडला त्यातही केवळ ३ तारखेला ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागील तीन वर्षाच ठाणे शहारत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता, ते सरासरी कमी होत गेले आहे यंदा कमी पडलेल्या पावसाने ठाणेकरावर पाणी कपातीच संकट ओढावले आहे. आतापासूनच महापालिकेने रोज १५ टक्के पाणी कपात केली आहे. त्याशिवाय दर बुधवारी आणि शुक्र वारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. सध्याचा पाणी साठा लक्षात घेता येत्या काही महिन्यात ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.