शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीच्या रौद्ररूपाने भरली बदलापूरकरांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

बदलापूर : उल्हास नदीला आलेला पूर बदलापूरकरांची चिंता पुन्हा वाढवून गेला आहे. आठ दिवसांनंतर पूरग्रस्त काही प्रमाणात स्थिरावलेले असतानाच शनिवारी रात्रीपासून अनेक सखल भागांत पाणी शिरले. त्यानंतर, रविवारी दुपारीही अनेक भागांत पाणी गेल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.२६ आणि २७ जुलैला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा आठ दिवसांनंतर झाली आहे. उल्हास नदीला पुन्हा पूर आल्याने पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांनी पुन्हा घर सोडून बाहेर आसरा घेतला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोनिवली गाव, यादवनगर, हेंद्रेपाडा, वालिवली गाव, रमेशवाडी आदी भागांतील नागरी वस्तीला या पुराचा तडाखा बसला. उल्हास नदीच्या किनाºयावर वसलेल्या या वस्तीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होताच सकाळी ८ नंतर सर्वांनी सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आधार घेतला. बदलापूर गावाकडे जाणारा उल्हास नदीवरील पूल भरून वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या गावांनाही या पुराचा फटका बसला.बीएसयूपीच्या घरांचा आसराउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या यादवनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी आल्याने नागरिकांनी आपले घर सोडून शेजारी असलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये आसरा घेतला. या घरांना पालिकेने कुलूप लावले होते. ते कुलूप तोडून नागरिकांनी आसरा घेतला. या पूरग्रस्तांसाठी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली.सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्षउल्हास नदीच्या प्रवाहात पुलाचा काही भाग वाहून जाण्याची भीती असतानाही या पुलावर पोलिसांची कोणतीच व्यवस्था नव्हती. नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज नव्हती. पुराची परिस्थिती भयाण होत असताना सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष होत होते.नदीचे फोटो काढण्यासाठी गर्दीउल्हास नदी भरून वाहत असताना या नदीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वालिवली गावाच्या पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी पुलावर उभे होते, तर काही नागरिक गाडी घेऊन या पुलावर पुराची परिस्थिती पाहत होते. बघ्यांच्या गर्दीत काही महिला आपल्या लहान मुलांनाही घेऊन या पुलावर पाणी पाहत होत्या.पहिल्या मजल्यापर्यंत पाणीउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या सर्वच इमारती या पाण्याखाली आलेल्या होत्या. अनेक घरे पाण्याखाली आली होती. नव्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. नदीकिनारी असलेले आश्रम, रिसॉर्ट हेही पाण्यात गेले होते. वालिवलीच्या पुलाशेजारी असलेले मोहन वॉटर एज हा प्रकल्प पूर्ण पाण्याखाली आला होता.किशोर आरोग्य केंद्राला पाण्याचा वेढाटोकावडे : किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली गेले होते. शनिवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया पावसामुळे या आरोग्य केंद्रात पुन्हा पाणी शिरले होते. तसेच कल्याण-माळशेज महामार्गावर पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. बदलापूर डॅम ते मुरबाड हा एकच मार्ग सुरू होता.

टॅग्स :floodपूर