शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

उल्हास नदीच्या रौद्ररूपाने भरली बदलापूरकरांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

बदलापूर : उल्हास नदीला आलेला पूर बदलापूरकरांची चिंता पुन्हा वाढवून गेला आहे. आठ दिवसांनंतर पूरग्रस्त काही प्रमाणात स्थिरावलेले असतानाच शनिवारी रात्रीपासून अनेक सखल भागांत पाणी शिरले. त्यानंतर, रविवारी दुपारीही अनेक भागांत पाणी गेल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.२६ आणि २७ जुलैला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा आठ दिवसांनंतर झाली आहे. उल्हास नदीला पुन्हा पूर आल्याने पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांनी पुन्हा घर सोडून बाहेर आसरा घेतला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोनिवली गाव, यादवनगर, हेंद्रेपाडा, वालिवली गाव, रमेशवाडी आदी भागांतील नागरी वस्तीला या पुराचा तडाखा बसला. उल्हास नदीच्या किनाºयावर वसलेल्या या वस्तीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होताच सकाळी ८ नंतर सर्वांनी सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आधार घेतला. बदलापूर गावाकडे जाणारा उल्हास नदीवरील पूल भरून वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या गावांनाही या पुराचा फटका बसला.बीएसयूपीच्या घरांचा आसराउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या यादवनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी आल्याने नागरिकांनी आपले घर सोडून शेजारी असलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये आसरा घेतला. या घरांना पालिकेने कुलूप लावले होते. ते कुलूप तोडून नागरिकांनी आसरा घेतला. या पूरग्रस्तांसाठी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली.सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्षउल्हास नदीच्या प्रवाहात पुलाचा काही भाग वाहून जाण्याची भीती असतानाही या पुलावर पोलिसांची कोणतीच व्यवस्था नव्हती. नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज नव्हती. पुराची परिस्थिती भयाण होत असताना सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष होत होते.नदीचे फोटो काढण्यासाठी गर्दीउल्हास नदी भरून वाहत असताना या नदीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वालिवली गावाच्या पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी पुलावर उभे होते, तर काही नागरिक गाडी घेऊन या पुलावर पुराची परिस्थिती पाहत होते. बघ्यांच्या गर्दीत काही महिला आपल्या लहान मुलांनाही घेऊन या पुलावर पाणी पाहत होत्या.पहिल्या मजल्यापर्यंत पाणीउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या सर्वच इमारती या पाण्याखाली आलेल्या होत्या. अनेक घरे पाण्याखाली आली होती. नव्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. नदीकिनारी असलेले आश्रम, रिसॉर्ट हेही पाण्यात गेले होते. वालिवलीच्या पुलाशेजारी असलेले मोहन वॉटर एज हा प्रकल्प पूर्ण पाण्याखाली आला होता.किशोर आरोग्य केंद्राला पाण्याचा वेढाटोकावडे : किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली गेले होते. शनिवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया पावसामुळे या आरोग्य केंद्रात पुन्हा पाणी शिरले होते. तसेच कल्याण-माळशेज महामार्गावर पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. बदलापूर डॅम ते मुरबाड हा एकच मार्ग सुरू होता.

टॅग्स :floodपूर