शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

उल्हास नदीच्या रौद्ररूपाने भरली बदलापूरकरांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:11 IST

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

बदलापूर : उल्हास नदीला आलेला पूर बदलापूरकरांची चिंता पुन्हा वाढवून गेला आहे. आठ दिवसांनंतर पूरग्रस्त काही प्रमाणात स्थिरावलेले असतानाच शनिवारी रात्रीपासून अनेक सखल भागांत पाणी शिरले. त्यानंतर, रविवारी दुपारीही अनेक भागांत पाणी गेल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.२६ आणि २७ जुलैला आलेल्या पुराची पुनरावृत्ती पुन्हा आठ दिवसांनंतर झाली आहे. उल्हास नदीला पुन्हा पूर आल्याने पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांनी पुन्हा घर सोडून बाहेर आसरा घेतला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाहही वाढल्याने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोनिवली गाव, यादवनगर, हेंद्रेपाडा, वालिवली गाव, रमेशवाडी आदी भागांतील नागरी वस्तीला या पुराचा तडाखा बसला. उल्हास नदीच्या किनाºयावर वसलेल्या या वस्तीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होताच सकाळी ८ नंतर सर्वांनी सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आधार घेतला. बदलापूर गावाकडे जाणारा उल्हास नदीवरील पूल भरून वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या गावांनाही या पुराचा फटका बसला.बीएसयूपीच्या घरांचा आसराउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या यादवनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी आल्याने नागरिकांनी आपले घर सोडून शेजारी असलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये आसरा घेतला. या घरांना पालिकेने कुलूप लावले होते. ते कुलूप तोडून नागरिकांनी आसरा घेतला. या पूरग्रस्तांसाठी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली.सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्षउल्हास नदीच्या प्रवाहात पुलाचा काही भाग वाहून जाण्याची भीती असतानाही या पुलावर पोलिसांची कोणतीच व्यवस्था नव्हती. नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा सज्ज नव्हती. पुराची परिस्थिती भयाण होत असताना सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष होत होते.नदीचे फोटो काढण्यासाठी गर्दीउल्हास नदी भरून वाहत असताना या नदीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वालिवली गावाच्या पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी पुलावर उभे होते, तर काही नागरिक गाडी घेऊन या पुलावर पुराची परिस्थिती पाहत होते. बघ्यांच्या गर्दीत काही महिला आपल्या लहान मुलांनाही घेऊन या पुलावर पाणी पाहत होत्या.पहिल्या मजल्यापर्यंत पाणीउल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या सर्वच इमारती या पाण्याखाली आलेल्या होत्या. अनेक घरे पाण्याखाली आली होती. नव्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. नदीकिनारी असलेले आश्रम, रिसॉर्ट हेही पाण्यात गेले होते. वालिवलीच्या पुलाशेजारी असलेले मोहन वॉटर एज हा प्रकल्प पूर्ण पाण्याखाली आला होता.किशोर आरोग्य केंद्राला पाण्याचा वेढाटोकावडे : किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी किशोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली गेले होते. शनिवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया पावसामुळे या आरोग्य केंद्रात पुन्हा पाणी शिरले होते. तसेच कल्याण-माळशेज महामार्गावर पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. बदलापूर डॅम ते मुरबाड हा एकच मार्ग सुरू होता.

टॅग्स :floodपूर