शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ठाणे जिल्ह्यात पावसाने लावली पुन्हा दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:56 IST

झाडांची पडझड : मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला, महामार्गावरही कोंडी

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. बुधवारी दुपारी पाच वाजेपर्यंत ठाण्यात७०.०९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कोपरी येथील एका इमारतीच्या संरक्षक भिंतीवर वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली. पाऊस आणि खड्ड्यांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेगही मंदावला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांतही पावसाचा जोर वाढला होता.मागील आठवड्यात मुंबई, ठाण्याला झोडपणाऱ्या पावसाने सोमवारी, मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली होती. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, बुधवारी पहाटेपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कोपरी येथील बाराबंगला परिसरात एक झाड बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर उन्मळून पडले. वर्तकनगर येथेही झाड पडून रवींद्र मोहिते यांच्या घराचे नुकसान झाले. वागळेच्या आयटीआय परिसरात एक वृक्ष कोसळला. येऊर येथे ओव्हरवायर पडल्याने सतीश मोरे यांच्या घरास हानी पोहचली.पावसामुळे घोडबंदर परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर येथील कापूरबावडी, कासारवडवली येथे वाहतूककोंडी झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा परिसरातही पावसामुळे कोंडी झाली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणाºया वाहनचालकांना या कोंडीचा परिणाम जाणवला. भिवंडीत ७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुपारी अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडली. कल्याणमध्येही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता.वाहनधारकांची गैरसोयकल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अगोदरच बिकट झालेली असताना, मुसळधार पावसाची भर पडून शहरातील वाहतूक मंदावली होती. ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने यातून मार्ग काढताना वाहनधारकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सदैव वर्दळीच्या असलेल्या कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी साचले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत मंगळवार रात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरांत ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पावसामुळे सकाळी नोकरदारवर्गाची कामावर जाताना तारांबळ उडाली.रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार पावसाच्या सरींपासून बचाव करण्यासाठी मार्ग काढताना दिसत होते. भाजीखरेदीसाठी आलेल्या गृहिणी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एसटी, केडीएमटी बस तसेच रिक्षांच्या प्रतीक्षेत पावसातच उभे राहावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. दुसरीकडे पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.ठाकुर्लीत खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीठाकुर्लीतील मारुती मंदिराजवळ खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने तेथे कोंडी झाली होती. दरम्यान, नगरसेवक राजेश मोरे यांच्या प्रभागात पक्ष कार्यालयानजीक पाणी साचले होते.