शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

कोकणात या वेळी जास्त पाऊस

By admin | Updated: May 12, 2016 02:04 IST

प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर

ठाणे : प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर राहील, असे प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पालिका, नगर परिषदा तसेच विभागांना या वेळच्या पावसाचे भाकीत पाहता आपत्तीच्या दृष्टीने चांगले नियोजन करण्याचे निर्देशही दिले. शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचादेखील आपत्ती निवारणात कसा सहभाग वाढेल, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ठाणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीने यापूर्वीदेखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही इमारती ढासळून जीवितहानी झाली आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत २० ते २५ मेपर्यंत सर्व पालिका आणि नगर परिषदांनी आपल्या भागातील जीर्ण, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच योग्य पद्धतीने नोटिसा द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.कल्याण-डोंबिवली परिसरात ३०० अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती आयुक्त ई. रवींद्रन यांनी या वेळी दिली. तसेच एनडीआरएफचे पथक आपत्तीच्या वेळी अधिक लवकर कसे पोहोचेल, हे पाहण्याची सूचना त्यांनी केली. भातसा परिसरात वायरलेस यंत्रणाभातसा परिसरात वायरलेस यंत्रणा नसल्याने मोबाइलच्या रेंजवर अवलंबून राहावे लागते आणि पाणीसाठ्याची माहिती देण्यासाठी शहापूरला जावे लागते, असे या वेळी जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भातसा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात अशी यंत्रणा बसवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.जिल्ह्यात पावसाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या आपत्तीत सर्व पालिकांच्या नियंत्रण कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी योग्य समन्वय ठेवावा तसेच कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्तीशी संबंधित अतिरंजित व चुकीच्या बातम्या जाणार नाहीत, याकडे लक्ष ठेवावे असे सांगितले.आसनगाव तालुक्यात एप्रिलअखेर तीव्र पाणीटंचाई भेडसावत असतानाच ११ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आगमन झालेल्या पावसाने ऐन उष्णतेत शहापूरकरांनी सुखद गारवा अनुभवला. तालुक्यातील किन्हवली परिसरातील अस्नोली, मालेगाव या परिसरांत सौम्य गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. सरपण, शेण, गुरांचा चारा भिजून चिंब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, तरीही बळीराजाच्या लवकर आगमनाने शेतकरी सुखावला आहे.