शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार

By admin | Updated: July 23, 2015 03:58 IST

मंगळवारी जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवारीही आपला जोर कायम ठेवला. सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप दिलेल्या पावसा

ठाणे : मंगळवारी जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवारीही आपला जोर कायम ठेवला. सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोर धरला. मात्र, कुठेही फारसे नुकसान झाले नाही. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांसाठी शेतांकडे धाव घेतली आहे. तर, पालघरमधील पूरस्थिती ओसरली असली तरीही सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आगामी ४८ तासांत ठाण्यासह कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सुमारे १५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने मंगळवारपासून चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात १०४.८९ मिमी इतका पाऊस झाला असून धरणामधील पाणीसाठा ७६.०२ टक्के इतका झाला आहे. मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसाने बुधवारी पहाटे साडेतीन वाजेपासून थोडीशी उघडीप दिली होती. मात्र, दुपारी १ वाजेपासून पावसाने पुन्हा आपली संततधार सुरू केली. ठाणे शहरातील घंटाळी येथे एक झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. बुधवारी दिवसभरात ठाण्यात ९८ मिमी, कल्याणात १०० मिमी, मुरबाडमध्ये १०६ मिमी, भिवंडीत १८० मिमी, शहापूर १५२ मिमी, उल्हासनगर ६१ मिमी, अंबरनाथ ३६.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७३४.२० मिमी इतका पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास तो ७३९.५३ मिमी इतका होता. सर्वाधिक पाऊस हा ठाणे परिसरात झाला असून सर्वात कमी उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यांत झाला आहे.मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांच्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील उंचावण्यास मदत झाली असून भातसामध्ये १२.८४ टक्के तर मोडकसागरमध्ये २.५४ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. तानसा आणि बारवी धरणांमध्ये अनुक्र मे १.५७ आणि १.११ टक्के पाणीसाठा आहे. बिर्लागेट : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला असून रायता-दहागाव रस्त्यावर झाड पडले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, अशी भीती आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यात ३०० मिमीच्या आसपास पाऊस पडला, तर आतापर्यंत ९५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कालच काळू नदीवरील रुंदा पूल पाण्याखाली गेल्याने १० ते २० गावांचा संपर्क तुटला होता. आज पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला आहे. म्हारळ, रायता, कांबा येथील सखल भागात पाणी साचले होते. तर पाचरघोळ, पाचवामैल येथील गणेशघाट पाण्याखाली गेला होता. भिवंडी : ठाणे महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या समांतर रस्त्यावरील धूळ खाडीचा लहान पूल तुटल्याने महानगरपालिकेच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच सोनाळे-बापगाव दरम्यानच्या १५ गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील भातसा-पिसे धरणामधून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ठाणे महानगरपालिकेने टाकली असून या पाइपलाइनची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र रस्ता बनविला आहे. या रस्त्यावरून परिसरातील १५ गावांतील ग्रामस्थ दररोज शहरात येत होते. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात या मार्गावरील धूळखाडीचे पाणी पुलावरून वाहत जाऊन त्या पाण्यात काल रात्रीदरम्यान पूल वाहून गेला. सोनाळे-बापगावदरम्यानचा हा पूल सन १९७० मध्ये ठाणे महानगरपालिकेने बांधला होता. काळू नदीला पूरटिटवाळा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने टिटवाळा शहराशी असलेला १५ गावांचा संपर्क दोन दिवसांपासून तुटला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी यामुळे भाजीवाले, दूधवाले, शाळा, कॉलेज विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुलावरील पाणी ओसरणे कठीण आहे.