शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

देवीच्या मूर्तींना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गणेशोत्सवानंतर पडघम वाजू लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग सुरू आहे; ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गणेशोत्सवानंतर पडघम वाजू लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग सुरू आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका देवीच्या मूर्तींना बसत असल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. गणेशमूर्तींप्रमाणे देवीच्या मूर्तींच्या किमतीतही २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची कसरत सुरू आहे. कमी दिवस असल्याने वेळेत मूर्ती पूर्ण करून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, पाऊस थांबतच नसल्याने मूर्ती सुकविणे कठीण जात आहे. मूर्ती लवकर सुकवायच्या कशा, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर आहे. मूर्ती सुकविण्यासाठी विविध पर्याय मूर्तिकारांकडून अवलंबिले जात आहेत. यासाठी हॅलोजन किंवा भट्टीचाही वापर करावा लागत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. दुसरीकडे रंगकामही सुरू आहे. दीड ते चार फुटांच्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे; परंतु दोन ते साडेतीन फुटांच्या मूर्तींना मागणी अधिक असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी सांगितले. यंदा मूर्तींच्या दरांत अधिक वाढ झाली आहे. मूर्तींवर लावण्यात येणाऱ्या हिऱ्यांमुळेही मूर्तीचे दर जास्त आहेत, असे बोरीटकर म्हणाले. दीड फुटांची मूर्ती अडीच हजार रुपये, तर चार फुटांची मूर्ती १२ हजार रुपयांना आहे.

सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना मागणी

मूर्तींच्या बुकिंगला तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. घरगुतीपेक्षा सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना मागणी आहे. घरगुती नवरात्रोत्सवात बोटांवर मोजण्याइतक्याच मूर्ती खरेदी केल्या जातात. सार्वजनिक मंडळांना टेंभीनाक्याच्या प्रसिद्ध देवीसारखीच मूर्ती हवी असल्याचे मूर्ती विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले.

------------