शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रेल्वे सुरक्षा बलाने परत केली 25 कोटीच्या धनादेशाची बॅग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:21 IST

25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला

कल्याण- 25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला.  कल्याणमध्ये राहणारे राजाराम मोरे हे एका खाजगी एजेन्सीमध्ये काम करातात. ही एजेन्सीद्वारे बँकेचे धनादेश गोळा केले जातात.  राजाराम हे त्यांच्या साथीदारासह कल्याणहून 12 वाजून 53 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल गाडी पकडली. राजारामची टिमकडे एका बॅगेत 25 कोटीचे धनादेश होते. राजाराम दादर स्थानकात कामानिमित्त उतरले. त्यांच्या टिमचे अन्य सदस्य हे मुंबई स्थानकाकडे निघून गेले. काही तासानंतर एका बँकेतून फोन आला की, एलआयसीचे धनादेश अद्याप प्राप्त झालेले नाही. राजारामने त्वरीत आपल्या टीमच्या साथीदाराना फोन करुन विचारणा केली की,  बॅकेतून फोन आला होता. एलआयसीचे धनादेश अद्याप मिळालेली नाही. त्याच्या सहका:यांनी आमच्या कडे धनादेशाची ती बॅगच नाही. हे उत्तर ऐकून राजारामला दरदरुन घाम फुटला. त्याने कल्याण, डोंबिवली अशा प्रत्येक रेल्वे स्थानकात कळविण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला की, त्यांची बॅग ही दादर स्थानकातील  रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी व बी. एन. यादव यांनी राजाराम यांना 25 कोटी रुपयांचे धनादेशाची बॅग परत केली तेव्हा कुठे राजाराम यांचा जीव भांडय़ात पडला. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे व रेल्वे प्रशासनाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल शतश: अभार मानले आहेत.