शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे समांतर रस्ता लवकरच पत्रीपुलाला जोडणार

By admin | Updated: May 3, 2017 05:20 IST

कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे कामही आता कल्याण-डोंबिवली

कल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे कामही आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतले असून, ते पूर्णत्वाला आले आहे. दुसऱ्या बाजूकडील पत्रीपुलाला जोडणाऱ्या या रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण केले जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीला ये-जा करण्यासाठी पूर्वी कल्याण-शीळ हा एकमेव मार्ग होता. परंतु, या मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूस चार-चार फुटी पदपथ आहे. नागरिक त्याचा वापर जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करत आहेत. तसेच येथे सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. रेल्वे समांतर रस्ता रस्त्याचा काही भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. त्यासाठी महापालिकेने रेल्वेकडे पाठपुरावा केला. रेल्वेकडून परवानगी मिळाल्याने आता २४ मीटरच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता पत्रीपुलाला जोडला जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला रस्ता बंद केला जाणार आहे. दरम्यान, पत्रीपुलानजीकचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी ते लवकरच पूर्ण केले जाईल, असे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)विद्रुपीकरणाकडे कानाडोळा समांतर रस्त्यालगत पुन्हा बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. मटणाची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डींगची दुकाने, ढाबे, गाड्या धुवण्याचे सेंटर थाटण्यात आले आहे. या अतिक्रमणांकडे मध्यंतरी शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी लक्ष वेधले होते. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या या विद्रुपीकरणाकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय बनले आहे. बाइक राइडर्सचा धुमाकुळ मिनी मरीन ड्राइव्ह संबोधल्या जाणारा हा रस्ता शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा असताना दुसरीकडे मात्र या रस्त्यावर बाइक राइडर्सचा धुमाकूळ सुरू असतो. कल्याणकडे जाणाऱ्या लेनवर गतिरोधक नाहीत. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर असलेल्या बाइक्स येथे अतिवेगाने चालवल्या जातात. त्यामुळे अन्य वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच वाट काढावी लागते. तुटपुंजे बळाचे तुणतुणे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाजवले जात असल्याने या राइडर्सना रोखायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.