शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रेल्वे समांतर रस्ता लवकरच पत्रीपुलाला जोडणार

By admin | Updated: May 3, 2017 05:20 IST

कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे कामही आता कल्याण-डोंबिवली

कल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचे कामही आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतले असून, ते पूर्णत्वाला आले आहे. दुसऱ्या बाजूकडील पत्रीपुलाला जोडणाऱ्या या रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण केले जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीला ये-जा करण्यासाठी पूर्वी कल्याण-शीळ हा एकमेव मार्ग होता. परंतु, या मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूस चार-चार फुटी पदपथ आहे. नागरिक त्याचा वापर जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करत आहेत. तसेच येथे सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. रेल्वे समांतर रस्ता रस्त्याचा काही भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. त्यासाठी महापालिकेने रेल्वेकडे पाठपुरावा केला. रेल्वेकडून परवानगी मिळाल्याने आता २४ मीटरच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता पत्रीपुलाला जोडला जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला रस्ता बंद केला जाणार आहे. दरम्यान, पत्रीपुलानजीकचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी ते लवकरच पूर्ण केले जाईल, असे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)विद्रुपीकरणाकडे कानाडोळा समांतर रस्त्यालगत पुन्हा बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. मटणाची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डींगची दुकाने, ढाबे, गाड्या धुवण्याचे सेंटर थाटण्यात आले आहे. या अतिक्रमणांकडे मध्यंतरी शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी लक्ष वेधले होते. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या या विद्रुपीकरणाकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय बनले आहे. बाइक राइडर्सचा धुमाकुळ मिनी मरीन ड्राइव्ह संबोधल्या जाणारा हा रस्ता शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा असताना दुसरीकडे मात्र या रस्त्यावर बाइक राइडर्सचा धुमाकूळ सुरू असतो. कल्याणकडे जाणाऱ्या लेनवर गतिरोधक नाहीत. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर असलेल्या बाइक्स येथे अतिवेगाने चालवल्या जातात. त्यामुळे अन्य वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच वाट काढावी लागते. तुटपुंजे बळाचे तुणतुणे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाजवले जात असल्याने या राइडर्सना रोखायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.