शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रेल्वेत हरवलेली दागिन्यांची बॅग पुन्हा महिलेच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:45 IST

रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे.

ठाणे : रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे. मुंब्रा आरपीएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही बॅग परत मिळाली असून त्यामध्ये दोन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने होते.शुक्रवारी दुपारी मुंब्रा रेल्वेस्थानकात आरपीएफचे कर्मचारी गस्त घालत असताना स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर एक बॅग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत सोन्याचे दागिने होते. बॅग ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर एका महिलेने बॅग ओळखली.ही महिला शीळफाटा येथून मुंब्रा येथे रिक्षातून येत असताना तिच्याशेजारी बसलेल्या महिलेची बॅग असल्याची माहिती तिने आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना दिली. या महिलेला सोबत घेऊन आरपीएफने रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.हा रिक्षाचालक स्थानकाबाहेर भाड्याची प्रतीक्षा करत उभा होता. महिलेने रिक्षाचालकाला ओळखल्यानंतर या बॅगेविषयी शीळफाटा येथे कोणी चौकशी करत आहे का, याबाबत तेथील रिक्षाचालकांकडे विचारपूस करण्याविषयी आरपीएफने त्याला सांगितले. यात एक व्यक्ती तिकडे चौकशी करत असल्याची बाब समोर आली. त्यानुसार, आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाºयांनी शीळफाटा येथे धाव घेतल्यानंतर जनार्दन गोंधळी हे या बॅगेचा शोध घेत असल्याचे दिसून आले. नेमकी बॅग हरवली कोठे, याबाबत काहीच समजत नव्हते. आरपीएफने ही बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात मिळाली असल्याची गोंधळी यांना माहिती दिली.गोंधळी यांची पत्नी निर्मला (५०), रा. तळोजा, पनवेल या शुक्रवारी दिव्याला निघाल्या होत्या. रिक्षाने मुंब्रा येथे आल्यानंतर दागिन्यांची बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात विसरल्या होत्या. मात्र, आरपीएफच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे गोंधळी यांना बॅग पुन्हा मिळाली. मुंब्रा आरपीएफ कार्यालयात बोलावून घेऊन ती बॅग निर्मला यांच्या स्वाधीन केल्याची माहिती आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के. यादव यांनी दिली.