शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वेची वर्ल्ड बँकेकडे सहा हजार कोटी कर्जाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 06:20 IST

एमयूटीपी-३ अंतर्गत मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानचा नवा उपनगरीय मार्ग

नारायण जाधवठाणे : एमयूटीपी-३ अंतर्गत मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानचा नवा उपनगरीय मार्ग, तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विस्तारीकरणासाठी भारतीय रेल्वेला निधीची चणचण भासू लागली आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने जागतिक बँकेकडे सहा हजार कोटी रुपये कर्जाची मागणी केली आहे. एमयूटीपी-३ या संपूर्ण प्रकल्पाचा पहिला टप्पा एकूण १० हजार ९४७ कोटी खर्चाचा असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.यात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नत मार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नत मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. जागतिक बँकेने हे कर्ज मंजूर केल्यास, या प्रकल्पासह नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या पनवेल-कर्जत या नव्या उपनगरीय मार्गासही चालना मिळणार आहे.सध्या एमएमआरडीए क्षेत्रात सर्वात जास्त विकास पनवेल-कर्जत-खालापूर क्षेत्रात होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्रात या परिसराचा समावेश झाल्याने नजीकच्या भविष्यात पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग गरजेचा आहे. आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. त्यातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा विस्तार, विरार-अलिबाग कॉरिडोर आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फं्रटिअर कॉरिडोरमुळे या परिसरात येत्या काळात मोठ्या प्रमाणात उद्योगांसह मानवी वस्ती वाढणार आहे. यामुळे भविष्याची ही चाहूल ओळखून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्ग प्रस्तावित केला आहे.सध्या २८ किमीच्या या मार्गावर मालवाहतुकीसह एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू आहे, परंतु त्यावर उपनगरीय वाहतूक सुरू करायची झाल्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. यात नवीन मार्ग टाकणे, उपनगरीय स्थानकांचा विकास, विद्युतीकरणाचे जाळे, दोन उड्डाणपूल, तीन टनेल, १३ भूमिगत मार्ग, ४५ लघू पूल, दोन आरओबी, भूसंपादनासह वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. मात्र, एकंदरीत या परिसराचा विकास लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात या नव्या उपनगरीय मार्गास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.विरार-डहाणू या मार्गाचा विस्तारपश्चिम रेल्वेवरील सध्या सर्वात जलद विकास विरार-डहाणूदरम्यान होत आहे. मुंबई-अहमदाबादच्या विस्तारीकरणासह आता नियोजित वाढवण बंदरासह बुलेट ट्रेन आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फ्रंटिअर कॉरिडोरमुळे या परिसराचाही विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक ओळखून पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू या ६३ किमी मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडे पैशांची चणचणकळवा-ऐरोली उन्नतमार्गासह पनवेल-कर्जत आणि विरार-डहाणू मार्गाचा विस्तार या तिन्ही प्रकल्पांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाची विशेष हेतू कंपनी म्हणून निवड झाली आहे, परंतु रेल्वेकडे पैशांची चणचण आहे.कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी), या सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा रेल्वेस देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे. यातील चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसटी-पनवेल धिम्या मार्गांसाठीच्या १३ हजार कोटींहून अधिक खर्चाची जबाबदारी राज्य शासनाने सिडको, एमएमआरडीएसह मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेवर ढकलली आहे.सर्व महापालिकांनी यासाठी निधी देण्यास नकार दिला आहे. यामुळे रेल्वे विकास महामंडळाने आता एमयूटीपी-३ अंतर्गत, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जतदरम्यानच्या नव्या उपनगरीय मार्गासह पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू मार्गाच्या विस्तारीकरणासाठीही वर्ल्ड बँकेपुढे हात पसरला आहे.