शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:32 IST

वालधुनी नाल्यावर रेल्वेची मोहीम : सहा तासांच्या ब्लॉकमुळे अंबरनाथ व बदलापुरात मोठी वाहतूककोंडी

अंबरनाथ : रेल्वेची कल्याणहून कर्जत दिशेकडील रेल्वेसेवा रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या वालधुनी नाल्यावरील रेल्वेपुलाचे गर्डर धोकादायक झाल्याने ते काढून नवीन गर्डर यावेळेत बसवण्यात आले. रेल्वेची यंत्रणा या ठिकाणी सहा तास काम करत होती. या रेल्वेब्लॉकमुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. मेगाब्लॉकमुळे दोन्ही शहरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

अंबरनाथ येथील वालधुनीवरील रेल्वेपुलाचा लोखंडी सांगाडा कमकुवत झाल्याने तो बदलण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. गेल्या १५ दिवसांपासून या भागात पुलावरील गर्डर आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नाल्यातून रस्तादेखील तयार करण्यात आला. गर्डर पुलाजवळ आणल्यावर रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. या कामासाठी कल्याण ते बदलापूरपर्यंतची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १० वाजता रेल्वेने रेल्वेरूळ काढून त्यांच्याखाली असलेला लोखंडी पूल काढला. त्यासाठी मोठी क्रेनदेखील मागवण्यात आली. जुना लोखंडी गर्डर काढल्यावर लागलीच त्याठिकाणी अभियांत्रिकी काम करून सिमेंट काँक्रिटचे नवीन गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर बसवताच त्यावर लागलीच रेल्वेरूळ आणि खडी टाकून हा मार्ग रेल्वेने खुला केला. ६ तास चाललेल्या या कामासाठी शेकडोच्या संख्येने रेल्वे कर्मचारी काम करत होते. सहा तासांत हे काम पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. दुसरीकडे रेल्वेने नियमित रेल्वेरूळ आणि ओव्हरहेड वायरचीही दुरुस्ती करून घेतली आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते बदलापूर यादरम्यानच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बदलापूर ते कल्याण रिक्षाभाडे १५० रुपये प्रतिप्रवासी करण्यात आले होते. पर्यायी वाहतूकसाधन नसल्याने प्रत्येकाने खाजगी वाहनांचाच आधार घेतला. त्यामुळे अंबरनाथमधील फॉरेस्टनाका, एमआयडीसी चौक, विम्कानाका, बदलापुरातील उड्डाणपूल मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस आल्यावर त्यांनी ही कोंडी सोडवली.कल्याण शहरात वाहतूक ‘ब्लॉक’; ठिकठिकाणी वाहनांची रांगच्कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते अंबरनाथ यादरम्यान रविवारी दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकचा फटका कल्याण शहरातील रस्ते वाहतुकीला बसल्याने शहरात ‘वाहतूक ब्लॉक’ झालेली पाहायला मिळाली.च्कल्याण ते अंबरनाथदरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने काहींनी रस्तेवाहतुकीला प्राधान्य दिले होते. त्यामुळे पत्रीपूल, शहाडपूल, वालधुनी पुलाबरोबरच पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे तीन अधिकारी, ३० पोलिसांसह ४० वॉर्डनमार्फत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला.च्मेगाब्लॉकदरम्यान केडीएमटीतर्फे अंबरनाथकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या १५ बस कल्याण रेल्वेस्थानक परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच फेरीवाल्यांनी व्यापलेल्या या परिसरातही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.केडीएमटीला ९० हजारांचे उत्पन्न : कल्याण ते अंबरनाथ मेगाब्लॉकच्या दरम्यान केडीएमसीतर्फे रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कल्याण-बदलापूर अशी पहिली बस सोडण्यात आली. तर, दुपारी ४ वाजता शेवटची बस सोडण्यात आली. मेगाब्लॉकदरम्यान उपक्रमामार्फत पुरवण्यात आलेल्या ५० फेऱ्यांद्वारे सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे केडीएमटीला सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ