शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:32 IST

वालधुनी नाल्यावर रेल्वेची मोहीम : सहा तासांच्या ब्लॉकमुळे अंबरनाथ व बदलापुरात मोठी वाहतूककोंडी

अंबरनाथ : रेल्वेची कल्याणहून कर्जत दिशेकडील रेल्वेसेवा रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या वालधुनी नाल्यावरील रेल्वेपुलाचे गर्डर धोकादायक झाल्याने ते काढून नवीन गर्डर यावेळेत बसवण्यात आले. रेल्वेची यंत्रणा या ठिकाणी सहा तास काम करत होती. या रेल्वेब्लॉकमुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. मेगाब्लॉकमुळे दोन्ही शहरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

अंबरनाथ येथील वालधुनीवरील रेल्वेपुलाचा लोखंडी सांगाडा कमकुवत झाल्याने तो बदलण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. गेल्या १५ दिवसांपासून या भागात पुलावरील गर्डर आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नाल्यातून रस्तादेखील तयार करण्यात आला. गर्डर पुलाजवळ आणल्यावर रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. या कामासाठी कल्याण ते बदलापूरपर्यंतची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १० वाजता रेल्वेने रेल्वेरूळ काढून त्यांच्याखाली असलेला लोखंडी पूल काढला. त्यासाठी मोठी क्रेनदेखील मागवण्यात आली. जुना लोखंडी गर्डर काढल्यावर लागलीच त्याठिकाणी अभियांत्रिकी काम करून सिमेंट काँक्रिटचे नवीन गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर बसवताच त्यावर लागलीच रेल्वेरूळ आणि खडी टाकून हा मार्ग रेल्वेने खुला केला. ६ तास चाललेल्या या कामासाठी शेकडोच्या संख्येने रेल्वे कर्मचारी काम करत होते. सहा तासांत हे काम पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. दुसरीकडे रेल्वेने नियमित रेल्वेरूळ आणि ओव्हरहेड वायरचीही दुरुस्ती करून घेतली आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते बदलापूर यादरम्यानच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बदलापूर ते कल्याण रिक्षाभाडे १५० रुपये प्रतिप्रवासी करण्यात आले होते. पर्यायी वाहतूकसाधन नसल्याने प्रत्येकाने खाजगी वाहनांचाच आधार घेतला. त्यामुळे अंबरनाथमधील फॉरेस्टनाका, एमआयडीसी चौक, विम्कानाका, बदलापुरातील उड्डाणपूल मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस आल्यावर त्यांनी ही कोंडी सोडवली.कल्याण शहरात वाहतूक ‘ब्लॉक’; ठिकठिकाणी वाहनांची रांगच्कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते अंबरनाथ यादरम्यान रविवारी दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकचा फटका कल्याण शहरातील रस्ते वाहतुकीला बसल्याने शहरात ‘वाहतूक ब्लॉक’ झालेली पाहायला मिळाली.च्कल्याण ते अंबरनाथदरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने काहींनी रस्तेवाहतुकीला प्राधान्य दिले होते. त्यामुळे पत्रीपूल, शहाडपूल, वालधुनी पुलाबरोबरच पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे तीन अधिकारी, ३० पोलिसांसह ४० वॉर्डनमार्फत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला.च्मेगाब्लॉकदरम्यान केडीएमटीतर्फे अंबरनाथकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या १५ बस कल्याण रेल्वेस्थानक परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच फेरीवाल्यांनी व्यापलेल्या या परिसरातही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.केडीएमटीला ९० हजारांचे उत्पन्न : कल्याण ते अंबरनाथ मेगाब्लॉकच्या दरम्यान केडीएमसीतर्फे रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कल्याण-बदलापूर अशी पहिली बस सोडण्यात आली. तर, दुपारी ४ वाजता शेवटची बस सोडण्यात आली. मेगाब्लॉकदरम्यान उपक्रमामार्फत पुरवण्यात आलेल्या ५० फेऱ्यांद्वारे सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे केडीएमटीला सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ