शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना प्रवेश नाकारल्याने पालिकेत राडा

By admin | Updated: August 31, 2016 03:05 IST

दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात

भाईंदर : दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात केल्याने सोमवारी भाईंदर पालिकेत राडा झाला. इतर वेळेत खु्द्द सभापतींनाच अडवण्यात आल्याने त्यांनी कारभारावर टीकास्त्र सोडले. मीरा-भार्इंदर पालिकेने दुपारी २.३० ते ३.३० याखेरीज इतर वेळेत मुख्यालयात येणाऱ्यांना रोखण्यासाठी सोमवारपासून प्रवेशद्वारच बंद केल्याने काँग्रेसचे प्रभाग पाचमधील सभापती प्रमोद सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घातला. उपद्व्यापी लोकांमुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळा वेळ मिळावा, तसेच सतत ये-जा करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी नागरिकांना मुख्यालयात मर्यादित वेळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यावर काहूर उठल्यावर नाराजांना पूर्णवेळ प्रवेश मंजुुर करण्यात आला. त्यावर कोणीही ब्र काढला नाही. यानंतर मुख्य प्रवेशद्वारासह प्रत्येक मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ बायोमेट्रिक हजेरीसाठी थम्ब इंम्प्रेशन यंत्रे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. ते पूर्ण होताच काही काळ निश्चित वेळेतील प्रवेश सुरु झाला. मात्र सोमवारपासुन अचानक मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात निश्चित वेळेखेरीज बंद करण्यात आले. सामान्य नागरिकांना मुख्यालयाच्या आवारातच थोपवून धरण्यास आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली. कर भरणाऱ्यांना तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्रात, तर अर्ज देणाऱ्यांची मुख्यालयाबाहेर सोय करण्यात आली. प्रवेशद्वारच बंद झाल्याने काहींनी संताप व्यक्त केला. त्यातच प्रभाग सभापती प्रमोद सामंत दुपारी साडेतीननंतर मुख्यालयात आले असता त्यांना मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आत जाण्यापासून रोखण्यात आले. सुरक्षारक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे लक्षात येताच सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळच राडा केला. युतीतील सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातुन प्रशासनाने हुकुमशाही सुरु केल्याचा आरोप केला. संतप्त सामंत यांनी महापौर गीता जैन यांची भेट घेत प्रशासनाची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास आणले. मात्र महापौरांनी यावर प्रशासनाची बाजू घेत थातुर-मातुर उत्तर दिल्याचे सामंत यांनी सांगितले. महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. (प्रतिनिधी)