शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

खाजगी जागेवर असलेल्या झोपड्या त्वरित हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:34 IST

रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या.

पंकज पाटीलअंबरनाथ : रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या. या संदर्भात उच्च न्यायालायत याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश या आधीच दिले होते. मात्र कारवाईच्या दिवशी झोपडपट्टीधारकांनी पावसाळा असल्याचे कारण पुढे करत मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र २२ जूनच्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही कारण न ऐकता आठवड्याभरात कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांवर ऐन पावसाळ््यात बेघर होण्याची वेळ आली आहे.उल्हासनगर- अंबरनाथच्या मध्यभागी साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्याबाजूला असलेल्या ५० ते ५५ कुटुंबियांना रस्ता रूंदीकरणात आपली झोपडी तोडून स्थलांतरीत होण्याची वेळ आली होती. या झोपडपट्टी धारकांना ही जागा सोडण्यासाठी एका खाजगी व्यक्तीने परस्पर विम्को कंपनीजवळील मोकळ्या भूखंडावर १०० हून अधिक झोपड्या उभारल्या. काही रक्कम आकारून साईबाबा मंदिराजवळील झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र ज्या जागेवर नव्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या ती जागा एका खाजगी व्यक्तीची असून त्याने ती जागा कर्जासाठी बँकेकडे तारण ठेवली होती. त्यामुळे या जागेवरून झोपड्या हटवण्याची मागणी बँकेकडून करण्यात आली. मात्र या झोपड्यांवर कारवाई न झाल्याने संबंधीत बँक आणि जमीनमालकाने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने संबंधित झोपड्या हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पालिका कार्यालयांची एकत्र कारवाई करणार होते. मात्र कारवाईच्या दिवशीच रहिवाशांनी पावसाळा संपत नाही तोवर मुदत मागितली होती. कारवाई झाल्यास कुटुंब उघड्यावर येतील याची कल्पना देण्याचा निर्णय झाला.