शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

उल्हासनगरात लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कॅम्प नं ५, शाळा क्रं २८ मधील कोरोना लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कॅम्प नं ५, शाळा क्रं २८ मधील कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळून लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑनलाईन व टोकन पद्धतीने लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.

उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. राजा रिजवानी विविध उपक्रम राबवत आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयटीआय कॉलेज इमारत व कॅम्प नं ५ येथील शाळा क्रं २८ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. दररोज ४०० पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण या केंद्रात होत असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. तसेच काही खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र लसींची संख्या अत्यंत कमी आहे. तर मध्यवर्ती रुग्णालयात लसीकरण सुरू असून रुग्णालयाला राज्य सरकारकडून लसीचा साठा देण्यात येतो. लसीकरण जास्तीत जास्त होण्यासाठी केंद्र वाढविण्याचे संकेत महापालिका आरोग्य विभागाने दिले आहेत.

शहर पूर्वेला एकमेव लसीकरण केंद्र असल्याने नागरिक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारातून लसीकरण सुरू असून नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रावर रांगा लावत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्रावर नागरिकांना बसण्याची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसून पॅरासिटेमॉलच्या गोळ्याही दिल्या जात नाही. तसेच लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना लसीबाबत प्राथमिक माहिती दिली जात नसल्याने बहुतांश नागरिक लसीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते.

लसीकरण केंद्र नव्हेतर संसर्ग केंद्र?

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील नागरिकांची गर्दी बघता हे लसीकरण केंद्र नव्हे तर कोरोना संसर्ग केंद्र असल्याची टीका मनसेकडून होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी लसीकरण केंद्र प्रत्येक कॅम्पमध्ये सुरू करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे.