शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बेरोजगारांचे प्रश्न साहित्यात उमटावेत- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:11 IST

देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे.

ठाणे : देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे. अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागत आहे. एकेका कार्यालयातील शेकडो कर्मचारी बेकार होणार आहेत, त्यांच्या घरातील चुली पेटणार नाहीत या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी ठाण्यात व्यक्त केले.अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचा जाहीर सत्कार मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आला. ते पुढे म्हणाले, आज जर कविता लिहायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन लिहीली पाहिजे. त्यांचे पिकवलेले सगळेच वाहून गेले आहे. त्यांच्या डोळ््यांतील अश्रू वाचता आले पाहिजे हे सांगताना ते म्हणाले की, एकांत, चिंतन केल्याशिवाय, तिºहाईकाच्या नजरेने पाहिल्याशिवाय, दीपस्तंभ होऊन गेलेल्या व्यक्तींच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय कविता होत नाही. अशा प्रकारचे साहित्य हे टिकून राहते. शेक्सपिअर कधीच जुना झाला नाही. त्याने वास्तवावर कधी दुर्लक्ष केले नाही. त्याकाळी त्याने जे लिहीले ते वास्तव होते असे ते म्हणाले.अशोक बागवे म्हणाले की, स्वत:ला स्वत:चा आरसा म्हणून पाहणे म्हणजे कवितेची निर्मिती होय. तुमची कविता तुम्ही स्वत: लिहीली असेल तर ती मोबाईल घेऊन कावाचता अशी टीका करून ते म्हणाले, शब्दांनासुद्धा हृदयाच्या रक्तापर्यंत जाण्याची सवय असली पाहिजे.कवी आकृती निर्माण करतो पण कृती का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत आता कृतीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कवींनी आपल्यानंतर येणाºया कवींना जपले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या ‘खिल्ली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिबे्रटो यांच्या हस्ते झाले.यावेळी कवी शरद गोरे आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, विजया माणगावकर, कार्यवाह परशुराम नेहेरे आदी उपस्थित होते. मीना पगारे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.।राजकारणावर कोपरखळीमहाराष्ट्राच्या लोकशाहीला हसावं की ठोकशाहीला हसावं कळत नाही अशी टिपणी करताना ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले की, साहित्यिक हा एकनिष्ठ असतो. तो दलबदलू किंवा पक्षबदलू नसतो अशी कोपरखळीही त्यांनी मारली.