शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न हरित लवादाकडे

By admin | Updated: May 14, 2016 00:40 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे. अशा वेळी एमआयडीसी, तारापूरकडून नव्याने सांडपाणी पाइपलाइन नवापूरच्या समुद्रात थेट ७.१ कि.मी. आत सोडण्यात येणार आहे. याविरोधात पर्यावरण विभागाच्या सचिवाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास दीड हजार लहानमोठे उद्योगधंदे असून कपड्यांवर रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. या कंपन्यांमधून निघणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीच्या रासायनिक प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवण्यात येते. तेथून ते प्रक्रिया करून पामटेंभी, नवापूरमार्गे नवापूरच्या समुद्रकिनाऱ्यालगत सोडले जात असल्याचे प्रदूषण मंडळ व एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या एमआयडीसीकडे २५ एमएलडी प्रक्रिया केंद्र असून ६० एमएलडी रासायनिक पाणी पूर्णपणे प्रक्रिया न करता तसेच नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने सर्व किनारपट्टीवरील पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. नवीन ६० एमएलडी प्रक्रिया केंद्राचे रासायनिक पाणी पाइपलाइनद्वारे नवापूर-आलेवाडी गावासमोरच्या समुद्रात ७.१ किमी आत सोडले जाणार असल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मासे, शंख, शिंपले यांनी समृद्ध असणारा हा भाग आज रासायनिक प्रदूषित पाण्याने नष्ट होऊ पाहत आहे. मच्छिमारांमध्ये याविषयी संतापाची भावना आहे. (प्रतिनिधी)