शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न हरित लवादाकडे

By admin | Updated: May 14, 2016 00:40 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे. अशा वेळी एमआयडीसी, तारापूरकडून नव्याने सांडपाणी पाइपलाइन नवापूरच्या समुद्रात थेट ७.१ कि.मी. आत सोडण्यात येणार आहे. याविरोधात पर्यावरण विभागाच्या सचिवाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास दीड हजार लहानमोठे उद्योगधंदे असून कपड्यांवर रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. या कंपन्यांमधून निघणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीच्या रासायनिक प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवण्यात येते. तेथून ते प्रक्रिया करून पामटेंभी, नवापूरमार्गे नवापूरच्या समुद्रकिनाऱ्यालगत सोडले जात असल्याचे प्रदूषण मंडळ व एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या एमआयडीसीकडे २५ एमएलडी प्रक्रिया केंद्र असून ६० एमएलडी रासायनिक पाणी पूर्णपणे प्रक्रिया न करता तसेच नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने सर्व किनारपट्टीवरील पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. नवीन ६० एमएलडी प्रक्रिया केंद्राचे रासायनिक पाणी पाइपलाइनद्वारे नवापूर-आलेवाडी गावासमोरच्या समुद्रात ७.१ किमी आत सोडले जाणार असल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मासे, शंख, शिंपले यांनी समृद्ध असणारा हा भाग आज रासायनिक प्रदूषित पाण्याने नष्ट होऊ पाहत आहे. मच्छिमारांमध्ये याविषयी संतापाची भावना आहे. (प्रतिनिधी)