शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उल्हासनगर रिपाइंत उभी फूट? भाजपसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 15:57 IST

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपा सोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपा सोबत आगामी महापालिका निवडणुकी बाबत चर्चा केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत. दरम्यान महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव याना मतदान केल्याने ते महापौर, उपमहापौर पदी निवडून आले. तसेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदक दिले. तर एका भाजप सदस्यांने समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असतांना, पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबत चर्चा केल्याने, रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला. 

भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदी पक्षाच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तर पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजप सोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही. असी प्रतिक्रिया दिली. शहर व पदाधिकारी कार्यकारणी बरखास्त केली असेलतर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय? अशी प्रतिक्रिया दिली.

रिपाईची शक्ती विखुरलेली? 

शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाईची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाईची शक्ती अनेक गटातटात विखुरली असून आठवले गटाची ताकद शहरात आहे. तसेच पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून पक्षाकडे भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौर पद आहे. भगवान भालेराव यांच्या एकले रे चलोच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेले पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आघाडीची सोबत केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर