शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उल्हासनगर रिपाइंत उभी फूट? भाजपसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 15:57 IST

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपा सोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपा सोबत आगामी महापालिका निवडणुकी बाबत चर्चा केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत. दरम्यान महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव याना मतदान केल्याने ते महापौर, उपमहापौर पदी निवडून आले. तसेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदक दिले. तर एका भाजप सदस्यांने समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असतांना, पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबत चर्चा केल्याने, रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला. 

भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदी पक्षाच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तर पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजप सोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही. असी प्रतिक्रिया दिली. शहर व पदाधिकारी कार्यकारणी बरखास्त केली असेलतर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय? अशी प्रतिक्रिया दिली.

रिपाईची शक्ती विखुरलेली? 

शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाईची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाईची शक्ती अनेक गटातटात विखुरली असून आठवले गटाची ताकद शहरात आहे. तसेच पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून पक्षाकडे भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौर पद आहे. भगवान भालेराव यांच्या एकले रे चलोच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेले पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आघाडीची सोबत केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर