शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

स्वच्छतेचे प्रश्नांकित दर्पण - लोकसहभागातून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:59 IST

केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे.

ठाणे जिल्हा हा २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार २३ मार्च २०१७ रोजी हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला. या पायाभूत सर्वेक्षणामधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या (लॉब) चार हजार ३०२ होती. त्यापैकी तीन हजार ७०९ कुटुंबांना शौचालये बांधून पूर्ण करून देण्यात आली. त्याचे फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.

जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून टप्पा-२ च्या पडताळणी प्रक्रियेत सर्व ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. नादुरुस्त शौचालयांची संख्या तीन हजार ८९ आहे. त्यांची सर्व कामे पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली आहे. ४३० ग्रामपंचायतींमधील ७७६ गावांच्या स्वच्छता इंडेक्सची माहिती आॅनलाइन करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ८२२ स्वच्छताग्राहींची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यात आलेली आहे.हगणदारीमुक्त ग्रामपंचायतींमध्ये शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्राही, जलसुरक्षक, शिपाई यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ग्रामीण भागात १५० ग्रामपंचायतींमध्ये कला पथकाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली आहे. शंभर ग्रामपंचायतींमध्ये एलईडीद्वारे जागृती केली, तर एसटी महामंडळाच्या १६५ बसगाड्यांवर जाहिरातींद्वारे जागृती केली. ग्रामपंचायतस्तरावर सात हजार ५०० दिनदर्शिकांचे वाटप केले. गावखेड्यांमधील ५० हजार शौचालयांवर स्वच्छतेशी निगडित स्टीकर व १० हजार शोषखड्ड्यांचे स्टीकर लावले. स्वच्छता व शौचालयवापराची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी ५३ जिल्हा परिषद गटांमध्ये स्वच्छतेचे मेळावे घेतले. महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महिला मेळाव्यांवर भर दिला. मासिकपाळी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता आदींद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सर्व ग्रामसेवक, सरपंच यांच्या कार्यशाळा घेऊन शाश्वत स्वच्छतेचे १५५ आराखडे तयार करून घेतले. उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे १३४ बृहद्आराखडे तयार करण्यात आले आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत. लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळवून स्वच्छतेशी संबंधित उपक्रम राबवल्यामुळे ठाणे जिल्हा ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकला.(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे. या यशस्वितेकरिता ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत२०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने काम केले. दोन वर्षांपूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर, जिल्ह्यात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन जिल्ह्याचा ग्रामीण भाग ‘स्वच्छ-सुंदर’ राहावा, याकरिता सातत्याने प्रयत्न केले. 

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान