शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फेरीवाल्यांचा प्रश्न अधांतरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:52 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो. परंतु, यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्या कार्यकाळात मार्चमध्येही बैठक रद्द झाली होती. त्यानंतर, गुरुवार होणारी नगर पथविक्रेता समितीची बैठक अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली. ही बैठक पुढे ढकलली असली, तरी सलग दोन बैठका रद्द झाल्याने फेरीवाला संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे सोयरसुतक नसल्याने बैठका वारंवार रद्द केल्या जात असल्याचा त्यांचाआरोप आहे.फेरीवाल्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीने आजवर कोणतीही ठोस कृती केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगर पथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: आहेत. या समितीत प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही आहेत.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मार्चमध्ये वेलरासू यांनी बैठक बोलावली होती. परंतु, त्यांना कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यावेळी पुढील तारीखही कळवलेली नव्हती. याबाबत, फेरीवाला प्रतिनिधींनी तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.दरम्यान, गुरुवारी पुन्हा नगरपथविक्रेता समितीची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांनी बोलावली होती. आयुक्तांच्या दालनात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार होती. परंतु, नगरपथ समितीच्या सदस्यांना पत्र पाठवून ही बैठक रद्द केल्याचे बुधवारी सांगण्यात आले. काही अपरिहार्य कारणांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुढील बैठक १५ मे ला दुपारी ३.३० ला होणार आहे.