शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:46 IST

४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत ७८२ धोकादायक इमारती मनपा हद्दीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. यामध्ये २१0 इमारती अतिधोकादायक आहेत.यातील ४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता तरी मनपा प्रशासन धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित करेल का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटुंबे राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. त्यावेळी शासनाने दखल घेऊन अनधिकृत, धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महानगरपालिकेच्या एकूण पाच प्रभाग समित्या असून प्रभाग समिती क्र. १ मध्ये १६, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १५९, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १0८, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र. ५ मध्ये २२१ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये हजारो नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका असल्याची प्रचीती या दुर्घटनेतून आली आहे.782इमारतीधोकादायक210इमारतीअतिधोकादायक