शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:46 IST

४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत ७८२ धोकादायक इमारती मनपा हद्दीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. यामध्ये २१0 इमारती अतिधोकादायक आहेत.यातील ४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता तरी मनपा प्रशासन धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित करेल का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटुंबे राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. त्यावेळी शासनाने दखल घेऊन अनधिकृत, धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महानगरपालिकेच्या एकूण पाच प्रभाग समित्या असून प्रभाग समिती क्र. १ मध्ये १६, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १५९, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १0८, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र. ५ मध्ये २२१ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये हजारो नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका असल्याची प्रचीती या दुर्घटनेतून आली आहे.782इमारतीधोकादायक210इमारतीअतिधोकादायक