शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रश्नोत्तरांचा तास महासभेऐवजी चक्क आयुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:26 IST

महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली.

ठाणे : महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली. महासभेच्या नियमांना केराची टोपली दाखवून आयुक्तांच्या दालनात तासभर घेतलेल्या या प्रश्नोत्तराच्या तासाचे व्हिडीओ चित्रीकरणही केल्याने नगरसेवक संतप्त झाले आहेत. मात्र, एवढ्या गंभीर प्रश्नाबाबत जाब विचारणे तर दूरच राहिले, सत्ताधारी शिवसेनेने मौन बाळगून प्रशासनापुढे शेपूट घातल्याचे महासभेत दिसले.महापालिकेचे सदस्यजसे काय आरोपी आहेत, अशा पद्धतीने महासभेला अंधारात ठेवून त्यांची चौकशी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता आम्ही प्रश्न विचारायचे की नाही, असा सवाल करून प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचा हा नवा पायंडा कोणत्या कायद्याच्या आधारे आयुक्तांनी पाडला, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.शनिवारी महासभा सुरू होताच, पवार यांनी या गंभीर मुद्याला हात घातला. त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका आशा शेरबहादूर सिंग यांनी महासभेसाठी आस्थापना विभागाचे काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर त्यांना शुक्रवारी महापालिकेत बोलावले होते. परंतु, येताना एकट्यानेच यावे. आल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही केले जाईल, अशा आशयाचे पत्र दिले होते. त्यानुसार, त्या आणि इतर काही नगरसेवक ज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना क्रमाक्रमाने बोलावण्यात आले. परंतु, जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे सोडून इतर प्रश्नांचा आमच्यावर भडीमार केल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उपस्थित केला. बंदिस्त खोलीत तासभर डांबून ठेवून आम्ही जसे काय आरोपीच आहोत, अशा पद्धतीने आमची शाळा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे जी काही माहिती हवी आहे, ती माहिती अधिकारात विचारावी, असा अनाहूत सल्ला आयुक्त जर नगरसेवकांना देत असतील, तर हा घटनेने लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकारांचा अवमान नाही काय, असे अन्य एका नगरसेवकाने सांगितले.जे प्रश्न महासभेत विचारले गेले आहेत, त्यांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने आयुक्तांसह त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी महापौरांचा अवमान करणे कितपत योग्य आहे, असा सवालही पवार यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांना बोलावून त्यांच्यासमोरच याची उत्तरे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.आयुक्त जयस्वाल महासभेत येताच सत्ताधारी शिवसेनेने भाजपाने आयुक्तांवर आरोप केले आहेत, याकडे लक्ष वेधले. शिवसेनेचे अनेक नगरसेवक, नगरसेविका आयुक्तांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. महापौरांनी हे प्रकरण गुंडाळून विषयपत्रिका सुरू करण्याचे आदेश दिले....तर सभागृह करमणुकीच्या कार्यक्रमांना द्यावेआयुक्त हे हुकूमशहा आहेत. त्यांना प्रश्न विचारलेले आवडतच नाहीत. पालिकेतील चार ते पाच अधिकारी, काही नगरसेवक आणि ठेकेदार यांची अभद्र युती पालिकेत आहे. त्यातूनच हे सगळे घडत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका ही अधिकाºयांच्या ताब्यात देऊन महासभेचे सभागृह हे करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी देणे योग्य ठरणार आहे.- उन्मेष बागवे,मतदाता जागरण अभियान, प्रतिनिधीविरोधकांनीविपर्यास केलासदस्यांचे बरेच प्रश्न होते. त्यात जुन्या प्रश्नांचाही समावेश होता. त्यानुसार, नगरसेवकांसमोर त्या विषयाच्या फायली ठेवून त्यातून हवी ती माहिती घ्या व काही अडचण असल्यास आम्हाला विचारा, असे सांगितले होते. परंतु, त्याचा विरोधकांनी विपर्यास केला आहे.- संदीप माळवी,उपायुक्त, ठामपा>विधिमंडळाचे प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवाकायद्यात तरतूद नसताना अशा पद्धतीने बंद खोलीत व्हिडीओ चित्रीकरण करणे अयोग्य आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांकडे तक्रार करणार आहे. त्यातही अशा पद्धतीने अधिकारी जर दालनात बोलावून सभागृहातील प्रश्न सोडवणार असतील, तर विधानसभेत आमदारांनी विचारलेले प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवावे.- नारायण पवार, गटनेते, भाजपा