शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

प्रश्नोत्तरांचा तास महासभेऐवजी चक्क आयुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:26 IST

महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली.

ठाणे : महासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना शुक्रवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये तो तास घेतल्याची धक्कादायक बाब शनिवारी झालेल्या महासभेत उघड झाली. महासभेच्या नियमांना केराची टोपली दाखवून आयुक्तांच्या दालनात तासभर घेतलेल्या या प्रश्नोत्तराच्या तासाचे व्हिडीओ चित्रीकरणही केल्याने नगरसेवक संतप्त झाले आहेत. मात्र, एवढ्या गंभीर प्रश्नाबाबत जाब विचारणे तर दूरच राहिले, सत्ताधारी शिवसेनेने मौन बाळगून प्रशासनापुढे शेपूट घातल्याचे महासभेत दिसले.महापालिकेचे सदस्यजसे काय आरोपी आहेत, अशा पद्धतीने महासभेला अंधारात ठेवून त्यांची चौकशी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता आम्ही प्रश्न विचारायचे की नाही, असा सवाल करून प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचा हा नवा पायंडा कोणत्या कायद्याच्या आधारे आयुक्तांनी पाडला, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.शनिवारी महासभा सुरू होताच, पवार यांनी या गंभीर मुद्याला हात घातला. त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका आशा शेरबहादूर सिंग यांनी महासभेसाठी आस्थापना विभागाचे काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर त्यांना शुक्रवारी महापालिकेत बोलावले होते. परंतु, येताना एकट्यानेच यावे. आल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही केले जाईल, अशा आशयाचे पत्र दिले होते. त्यानुसार, त्या आणि इतर काही नगरसेवक ज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना क्रमाक्रमाने बोलावण्यात आले. परंतु, जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे सोडून इतर प्रश्नांचा आमच्यावर भडीमार केल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उपस्थित केला. बंदिस्त खोलीत तासभर डांबून ठेवून आम्ही जसे काय आरोपीच आहोत, अशा पद्धतीने आमची शाळा घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे जी काही माहिती हवी आहे, ती माहिती अधिकारात विचारावी, असा अनाहूत सल्ला आयुक्त जर नगरसेवकांना देत असतील, तर हा घटनेने लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकारांचा अवमान नाही काय, असे अन्य एका नगरसेवकाने सांगितले.जे प्रश्न महासभेत विचारले गेले आहेत, त्यांची उत्तरे ही महासभेतच देणे अपेक्षित असताना अशा पद्धतीने आयुक्तांसह त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी महापौरांचा अवमान करणे कितपत योग्य आहे, असा सवालही पवार यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांना बोलावून त्यांच्यासमोरच याची उत्तरे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.आयुक्त जयस्वाल महासभेत येताच सत्ताधारी शिवसेनेने भाजपाने आयुक्तांवर आरोप केले आहेत, याकडे लक्ष वेधले. शिवसेनेचे अनेक नगरसेवक, नगरसेविका आयुक्तांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. महापौरांनी हे प्रकरण गुंडाळून विषयपत्रिका सुरू करण्याचे आदेश दिले....तर सभागृह करमणुकीच्या कार्यक्रमांना द्यावेआयुक्त हे हुकूमशहा आहेत. त्यांना प्रश्न विचारलेले आवडतच नाहीत. पालिकेतील चार ते पाच अधिकारी, काही नगरसेवक आणि ठेकेदार यांची अभद्र युती पालिकेत आहे. त्यातूनच हे सगळे घडत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका ही अधिकाºयांच्या ताब्यात देऊन महासभेचे सभागृह हे करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी देणे योग्य ठरणार आहे.- उन्मेष बागवे,मतदाता जागरण अभियान, प्रतिनिधीविरोधकांनीविपर्यास केलासदस्यांचे बरेच प्रश्न होते. त्यात जुन्या प्रश्नांचाही समावेश होता. त्यानुसार, नगरसेवकांसमोर त्या विषयाच्या फायली ठेवून त्यातून हवी ती माहिती घ्या व काही अडचण असल्यास आम्हाला विचारा, असे सांगितले होते. परंतु, त्याचा विरोधकांनी विपर्यास केला आहे.- संदीप माळवी,उपायुक्त, ठामपा>विधिमंडळाचे प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवाकायद्यात तरतूद नसताना अशा पद्धतीने बंद खोलीत व्हिडीओ चित्रीकरण करणे अयोग्य आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांकडे तक्रार करणार आहे. त्यातही अशा पद्धतीने अधिकारी जर दालनात बोलावून सभागृहातील प्रश्न सोडवणार असतील, तर विधानसभेत आमदारांनी विचारलेले प्रश्नही मुख्य सचिवांच्या दालनात सोडवावे.- नारायण पवार, गटनेते, भाजपा