शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या ...

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या सनातनी विचारांच्या साम्राज्याच्या प्रभावाला बाजूला करून प्रगतीशील विचारांना अवकाश मिळवून देणे, हे मोठ्या निर्भयतेचे आणि धडाडीचे काम आहे. पुष्पाताई भावे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ही निर्भयता आणि धडाडी नेहमीच प्रत्ययाला आली. ती नुसती शारीरिक नव्हे, तर त्यांच्या विचारांमध्ये, मांडणीमध्ये ती सतत दिसून आली. त्यांची कलात्मक सर्जनता ही नाट्यसमीक्षणे पुरती मर्यादित न राहता ती चिंतनशीलतेला भिडणारी होती आणि म्हणूनच खूप वरच्या दर्जाची होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि अनेक प्रगतीशील चळवळीचे उद्गाते बाबा आढाव यांनी केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आयोजित पुष्पा भावे स्मृती ग्रंथ, पुष्पा भावे : विचार व वारसा, याच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते.

आढाव पुढे म्हणाले, पुष्पाताई अकाली गेल्या, असे मला वाटते कारण त्यांच्या प्राध्यापक असण्याने त्यांना तरुण मुलांशी संवाद साधण्याची हातोटी होती. त्यांच्या विचारांचा प्रवाहीपणा, ठोसपणा आणि स्पष्टपणे, पण शांतपणे त्या करत असलेली विचारांची मांडणी तरुणांवर प्रभाव टाकणारी होती, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी होती. आजच्या वैचारिक गढूळतेच्या काळात अशा ठोस निर्भयतेने केलेल्या मांडणीची अतिशय आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या जाण्याने जी वैचारिक निर्भयतेची पोकळी निर्माण झाली आहे, ती थोड्या प्रमाणात भरून निघेल, अशी आशा वाटते. महात्मा गांधी यांनी मांडलेला सत्याग्रहाचा विचार महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बांधून पुढे नेला. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्यादिवशी पुष्पा भावे स्मृती ग्रंथाच्या निमित्ताने आपण संकल्प घेऊ की, शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर पुढे जाऊया. सत्यवादी लोकशाही संवाद तळागाळापर्यन्त निर्भयपणे पोहोचवूया, असे आवाहन त्यांनी केले.