शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या ...

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या सनातनी विचारांच्या साम्राज्याच्या प्रभावाला बाजूला करून प्रगतीशील विचारांना अवकाश मिळवून देणे, हे मोठ्या निर्भयतेचे आणि धडाडीचे काम आहे. पुष्पाताई भावे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ही निर्भयता आणि धडाडी नेहमीच प्रत्ययाला आली. ती नुसती शारीरिक नव्हे, तर त्यांच्या विचारांमध्ये, मांडणीमध्ये ती सतत दिसून आली. त्यांची कलात्मक सर्जनता ही नाट्यसमीक्षणे पुरती मर्यादित न राहता ती चिंतनशीलतेला भिडणारी होती आणि म्हणूनच खूप वरच्या दर्जाची होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि अनेक प्रगतीशील चळवळीचे उद्गाते बाबा आढाव यांनी केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आयोजित पुष्पा भावे स्मृती ग्रंथ, पुष्पा भावे : विचार व वारसा, याच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते.

आढाव पुढे म्हणाले, पुष्पाताई अकाली गेल्या, असे मला वाटते कारण त्यांच्या प्राध्यापक असण्याने त्यांना तरुण मुलांशी संवाद साधण्याची हातोटी होती. त्यांच्या विचारांचा प्रवाहीपणा, ठोसपणा आणि स्पष्टपणे, पण शांतपणे त्या करत असलेली विचारांची मांडणी तरुणांवर प्रभाव टाकणारी होती, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी होती. आजच्या वैचारिक गढूळतेच्या काळात अशा ठोस निर्भयतेने केलेल्या मांडणीची अतिशय आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या जाण्याने जी वैचारिक निर्भयतेची पोकळी निर्माण झाली आहे, ती थोड्या प्रमाणात भरून निघेल, अशी आशा वाटते. महात्मा गांधी यांनी मांडलेला सत्याग्रहाचा विचार महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बांधून पुढे नेला. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्यादिवशी पुष्पा भावे स्मृती ग्रंथाच्या निमित्ताने आपण संकल्प घेऊ की, शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर पुढे जाऊया. सत्यवादी लोकशाही संवाद तळागाळापर्यन्त निर्भयपणे पोहोचवूया, असे आवाहन त्यांनी केले.