शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेण्यात पुष्पा भावेंचे योगदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या ...

ठाणे : लोकशाही समाजवादी चळवळ सांस्कृतिक पातळीवर नेणे, जनमानसात ती रुजविणे हे सोपे काम नाही. कारण आपल्याकडे मोठ्याप्रमाणात पसरलेल्या सनातनी विचारांच्या साम्राज्याच्या प्रभावाला बाजूला करून प्रगतीशील विचारांना अवकाश मिळवून देणे, हे मोठ्या निर्भयतेचे आणि धडाडीचे काम आहे. पुष्पाताई भावे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ही निर्भयता आणि धडाडी नेहमीच प्रत्ययाला आली. ती नुसती शारीरिक नव्हे, तर त्यांच्या विचारांमध्ये, मांडणीमध्ये ती सतत दिसून आली. त्यांची कलात्मक सर्जनता ही नाट्यसमीक्षणे पुरती मर्यादित न राहता ती चिंतनशीलतेला भिडणारी होती आणि म्हणूनच खूप वरच्या दर्जाची होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि अनेक प्रगतीशील चळवळीचे उद्गाते बाबा आढाव यांनी केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आयोजित पुष्पा भावे स्मृती ग्रंथ, पुष्पा भावे : विचार व वारसा, याच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते.

आढाव पुढे म्हणाले, पुष्पाताई अकाली गेल्या, असे मला वाटते कारण त्यांच्या प्राध्यापक असण्याने त्यांना तरुण मुलांशी संवाद साधण्याची हातोटी होती. त्यांच्या विचारांचा प्रवाहीपणा, ठोसपणा आणि स्पष्टपणे, पण शांतपणे त्या करत असलेली विचारांची मांडणी तरुणांवर प्रभाव टाकणारी होती, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी होती. आजच्या वैचारिक गढूळतेच्या काळात अशा ठोस निर्भयतेने केलेल्या मांडणीची अतिशय आवश्यकता आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या जाण्याने जी वैचारिक निर्भयतेची पोकळी निर्माण झाली आहे, ती थोड्या प्रमाणात भरून निघेल, अशी आशा वाटते. महात्मा गांधी यांनी मांडलेला सत्याग्रहाचा विचार महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बांधून पुढे नेला. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्यादिवशी पुष्पा भावे स्मृती ग्रंथाच्या निमित्ताने आपण संकल्प घेऊ की, शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर पुढे जाऊया. सत्यवादी लोकशाही संवाद तळागाळापर्यन्त निर्भयपणे पोहोचवूया, असे आवाहन त्यांनी केले.