शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

डाळींचे भाव स्थिर, फळभाज्या मात्र कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या पावसामुळे फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. काही भाज्यांनी शंभरी तर काही भाज्यांनी पन्नाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सध्या पावसामुळे फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. काही भाज्यांनी शंभरी तर काही भाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. दुसरीकडे डाळींचे दर मात्र स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सण-उत्सवाच्या आधीपासून भाज्यांना महागाईची फोडणी मिळाली. शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका भाज्यांना बसला. त्यामुळे मोजक्याच भाज्यांची आवक सुरू असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

-----------------------------------

डाळींचे दर (प्रति किलो) हरभरा - ७०

तूर - १२०

मूग - १२०

उडीद - १२०

मसूर - ९० - १००

----------------------------------

फळभाज्यांचे वाढलेले दर (रु. / प्रति किलो)

मटार - १२०

गवार : १२०

टोमॅटो - ३० - ४०

वांगी - ८०

काकडी - ८०

सिमला मिरची - ८०

फ्लॉवर - ८०

कोबी - ८०

गाजर - ८०

भेंडी - ९० - १००

घेवडा - १०० - १२०

पावटा - १०० - १२०

फरसबी - १२० - १४०

------------------------

पालेभाज्यांचे वाढलेले दर (जुडी/प्रतिनग)

कोथिंबीर - ४० - ५०

मेथी - ५०

पालक - २०

-------------------------------

डाळींचे दर वाढलेले नाहीत. सर्वसामान्य रोजच्या जेवणात वरणाचा अधिक वापर करतात म्हणून सर्व डाळींमध्ये तूरडाळ आणि मूगडाळ जास्त खरेदी होत आहे. या महिन्यात तरी डाळींचे दर वाढणार नाहीत.

- पूनम मोरे, किराणा विक्रेत्या

------------------------------

शेतात गुडघाभर पाणी साचते तेव्हा पालेभाज्या खराब होतात, त्यामुळेच दर वाढलेले आहेत.

- संभाजी खेडेकर, पालेभाजी विक्रेते

------------------------------

पावसामुळे भाज्या महाग आहेत. भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे सर्व भाज्या बाजारात येत नाहीत.

- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या

--------------------------

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे दर स्थिर आहेत तर कांदा आणि लसणाचे दर उतरले आहेत. दुसरीकडे मात्र फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचेही दर आवाक्याबाहेर आहेत.

- शुभांगी मोरे, गृहिणी