शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

जि.प.च्या प्रभागरचनेविरोधात जनहित याचिका, आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:37 IST

ठाणे : आगामी निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणांची प्रभागरचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे.

ठाणे : आगामी निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणांची प्रभागरचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. मात्र, त्यासाठी असलेले नियम व निकष यांची पूर्तता न करता व नैसर्गिक अडथळे विचारात न घेता प्रभागांच्या सीमारेषा निश्चित केल्याच्या आरोपाखाली आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी ३० आॅक्टोबर रोजी होणार आहे.प्रभागरचना तयार झाल्यानंतर त्यावर हरकती मागितल्या असता सुमारे ३५ हरकती जिल्हाभरातून दाखल झाल्या होत्या. त्यातील ३३ हरकतींना एकच उत्तर देऊन निकाली काढल्या. उर्वरित दोन हरकतींवर विभागीय आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी होणाºया सुनावणीसाठी निवडणूक आयोग, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या सामान्य न्याय विभागास त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बोलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.सुमारे दोन वेळा हरकतींवरील सुनावणी स्थगित करून राजकीय पक्षांसह नागरिकांची नाराजी ओढून घेण्यात आली. याविषयी ‘जिल्हा परिषदेच्या ५३ गटांची अंतिम यादी ४ आॅक्टोबरला!’ या मथळ्याखाली लोकमतने २९ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील तर्कवितर्क व हालचालींची जाणीव करून दिली होती. शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळच्या पाच किलोमीटरच्या चेरपोली गटात न टाकता लांबच्या बिरवाडी गटात टाकले. यापासून सरलांबे सुमारे २२ किमी आहे. या गटातील गावांना तानसा, वैतरणा आदी धरणांचा अडथळा विचारात न घेता सुमारे ८२ किमी परिसरातील गावे गटात समाविष्ट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वासिंद गटातही खातिवलीसह दहागाव या एक किमी अंतरावरील गावाचा समावेश न करता अडीच किमीवरील भातसई गावाचा समावेश करण्यात आला.>या प्रभाग रचनेत जवळची गावे समाविष्ट करण्याऐवजी लांबची गावे समाविष्ट करून संबंधित गावांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. नियमांचे पालन व नैसर्गिक सीमा विचारात न घेता मनमानी पद्धतीने प्रभागरचना केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर वासिंद, आसनगाव आणि कसारा ग्रामपंचायतीचे प्रस्ताव नगरपंचायत करण्यासाठी दिलेले आहेत. या प्रस्तावांना विचारात घेऊनच प्रभागरचना होणे अपेक्षित आहे. पण, तसे झालेले नाही.