शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

जि.प.च्या प्रभागरचनेविरोधात जनहित याचिका, आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:37 IST

ठाणे : आगामी निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणांची प्रभागरचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे.

ठाणे : आगामी निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणांची प्रभागरचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. मात्र, त्यासाठी असलेले नियम व निकष यांची पूर्तता न करता व नैसर्गिक अडथळे विचारात न घेता प्रभागांच्या सीमारेषा निश्चित केल्याच्या आरोपाखाली आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी ३० आॅक्टोबर रोजी होणार आहे.प्रभागरचना तयार झाल्यानंतर त्यावर हरकती मागितल्या असता सुमारे ३५ हरकती जिल्हाभरातून दाखल झाल्या होत्या. त्यातील ३३ हरकतींना एकच उत्तर देऊन निकाली काढल्या. उर्वरित दोन हरकतींवर विभागीय आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी होणाºया सुनावणीसाठी निवडणूक आयोग, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या सामान्य न्याय विभागास त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बोलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.सुमारे दोन वेळा हरकतींवरील सुनावणी स्थगित करून राजकीय पक्षांसह नागरिकांची नाराजी ओढून घेण्यात आली. याविषयी ‘जिल्हा परिषदेच्या ५३ गटांची अंतिम यादी ४ आॅक्टोबरला!’ या मथळ्याखाली लोकमतने २९ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यातील तर्कवितर्क व हालचालींची जाणीव करून दिली होती. शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळच्या पाच किलोमीटरच्या चेरपोली गटात न टाकता लांबच्या बिरवाडी गटात टाकले. यापासून सरलांबे सुमारे २२ किमी आहे. या गटातील गावांना तानसा, वैतरणा आदी धरणांचा अडथळा विचारात न घेता सुमारे ८२ किमी परिसरातील गावे गटात समाविष्ट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वासिंद गटातही खातिवलीसह दहागाव या एक किमी अंतरावरील गावाचा समावेश न करता अडीच किमीवरील भातसई गावाचा समावेश करण्यात आला.>या प्रभाग रचनेत जवळची गावे समाविष्ट करण्याऐवजी लांबची गावे समाविष्ट करून संबंधित गावांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. नियमांचे पालन व नैसर्गिक सीमा विचारात न घेता मनमानी पद्धतीने प्रभागरचना केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर वासिंद, आसनगाव आणि कसारा ग्रामपंचायतीचे प्रस्ताव नगरपंचायत करण्यासाठी दिलेले आहेत. या प्रस्तावांना विचारात घेऊनच प्रभागरचना होणे अपेक्षित आहे. पण, तसे झालेले नाही.