शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डोंबिवलीत वाहतूक पोलिसांची जनजागृती : विनाहेल्मेट प्रवास केल्यास जीवावर बेतू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:13 IST

हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात राबवला.

ठळक मुद्देउपक्रमाला वाहनचालकांचा उदंड प्रतिसाद‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम

डोंबिवली: हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात राबवला.वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले की, ठाण्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडलेस लाईफ हा जनजागृतीपर उपक्रम शहरात पूर्वेला घेण्यात आला. इंदिरा गांधी चौकामध्ये हेडलेस असलेली व्यक्ती दुचाकी स्वारांना आवर्जून थांबवत होती, आणि हेल्मेटचे महत्व विषद करत होती. त्याला दुचाकीस्वारांनीही चांगला प्रतिसाद दिला, आणि यापुढे विनाहेल्मेट प्रवास न करण्यासंदर्भात ग्वाही दिली. गंभीरे म्हणाले की, अशा जनजागृतीमुळे नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटेल, अन्यथा नागरिकांमध्ये बेदरकारपणे गाड्या चालवणे, वेगाने गाड्या चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशी प्रवृत्ती वाढीस लागेल. हे वाहनचालकांच्या जीवाशी खेळणे आहे. दिवसागणिक रस्ते अपघातांचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सुरुच असल्याने शून्य अपघाताचा दिवस हे लक्ष्य गाठणे एक आव्हान झाले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे, चारचाकी चालवणा-यांनी सीट बेल्ट लावणे, वाहतूक नियमांचे पालन करणे हे केल्यास सुखद सुरक्षित आणि संरक्षित प्रवासाची हमी मिळेल असेही आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. डोंबिवलीतील युवा दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करु, वाहतूक नियमांचे पालन करु असे सांगत उपक्रमाला प्रतिसाद दिला. डोंबिवलीतील नागरिकांनी वाहतूक शाखेच्या उपक्रमाला दिलेल्या जनजागृतीमध्ये सामील होऊन या उपक्रमाचे महत्व जाणुन घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण