शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाणीटंचाईबाबत जनजागृतीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच दर १५ दिवसांनी होणाऱ्या कपातीमुळे शहरात टंचाई भेडसावत ...

मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच दर १५ दिवसांनी होणाऱ्या कपातीमुळे शहरात टंचाई भेडसावत आहे. याबाबत जनजागृती करावी, अशी विनंती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नगरसेवकांना केली आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून ९५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मंडळाकडून १२५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात ९ मार्चपासून ९५ दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. म्हणजेच ३० दशलक्ष लीटर पाणी कमी आहे. त्यातच पाण्याचे नियोजन व्हावे म्हणून पाटबंधारे विभागाने जानेवारीपासून १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे.

कपातीनंतर शहराचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. याशिवाय उदंचन केंद्रात वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड आणि कारणांनी तसेच शहर आधीच शेवटच्या टोकाला असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहरातील नागरिकांना या सर्व परिस्थितीची माहिती मिळावी म्हणून प्रसिद्धिपत्रक काढून नगरसेवकांनी जनजागृती करण्याची गरज बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे.