शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटींची तरतूद, स्थायी समितीत मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:19 IST

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा खड्डे भरण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्यावर खड्डे बुजवण्यावरील खर्च वाचेल, असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला आहे.पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर आणि वर्षभर खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १२ कोटींची तरतूद केली आहे. प्रशासनाने या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीने जानेवारीत रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरी भरण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर एकूण २७ कोटी रुपये खर्च येणार आहे. इतका मोठा खर्च करून खड्डे बुजवले जाणार नसतील तर हा पैसा जातो कुठे?, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जातात, केवळ काम झाले असे भासवले जाते का, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.त्यावर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले, खड्डा बुजवला की, त्याचा गुगल मॅप घेतला जातो. त्याठिकाणची इमेज काढून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवल्या जात नाहीत, हा आराप चुकीचा आहे. खड्डे भरण्याच्या कामाचे लेखा परीक्षण होते. त्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी दोन अभियंत्याची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर काम योग्य झाले आहे का, गुणवत्ता राखली गेली आहे का, याची शहानिशा करूनच कंत्राटदाराला बिले दिली जातात, असे सांगितले. त्यावर मागील वर्षीच्या कंत्राटदाराला अजूनही बिले दिलेली नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४०२ कोटी खर्चून काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी हे रस्ते केल्यास खड्डे बुजवण्यास येणारा खर्च वाचेल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही खड्ड्यांवर खर्च होत आहे.>अन्यथा परिस्थिती बिकट२७ गावांतील रस्ते अत्यंत खराब आहेत. त्यावर पॅच वर्क करावे लागणार आहे. अन्यथा पावसाळ्यात तेथील परिस्थिती अधिक बिकट होईल, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.