शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद! 

By सदानंद नाईक | Updated: June 14, 2023 18:43 IST

आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

उल्हासनगर : शहरातील १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र देणाऱ्यांना जागेची सनद देण्यात येणार असून ३० जून पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन शासन आदेशानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले. आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

देशाची फाळणी झाल्यानंतर विस्थापित झालेल्या बहुसंख सिंधी समाजाला कल्याण जवळील ब्रिटिशकालीन बरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून विस्थापिताच्या वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले. सुरवातीला उल्हासनगरची लोकसंख्या ९५ हजार होती. ती आता ९ लाखा पेक्षा जास्त झाली आहे. केंद्र शासनाने जमिनीची मालकी राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. त्यानंतर जागेची मालकी हक्क (सनद) देण्यासाठी राज्य शासनाने, सन १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र मागितले असून आज पर्यंत ३५ हजार पेक्षा जास्त जणांना जागेची मालकी म्हणजे सनद प्रांत कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या नागरिकडे जागेचा पुरावा व इतर कागदपत्र आहेत. त्यांनी ते ३० जून पूर्वी प्रांत कार्यालयात विशिष्ट नमुन्यात पोच करावी. असे आवाहन शासनाच्या निदर्शनानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.

 शहरातील जागेवर वर्षांनुवर्ष राहणाऱ्या नागरिकांनी जागेची मालकीहक्क (सनद) घेऊन जावे. त्यासाठी शासन नियमानुसार प्रांत कार्यालयाकडे अर्ज करून जागेवर कब्जाचे कागदपत्र सादर करावे. जागेची मालकीहक्क प्रकार निकाली काढण्यासाठी शासन आग्रही असल्याचे प्रांत अधिकारी।कारभारी यांनी सांगितले. ५ हजार जणांना अद्यापही सनद देणे बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रांत कार्यालयाच्या वतीने राहत्या जागेची व खुल्या मात्र ताबा असलेल्या जागेची सनद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रांत कार्यालयाच्या आदेशानंतर अनेकांनी जागेच्या सनदसाठी अर्ज आल्याचे उघड झाले. ३० जून पर्यंत नागरिकांनी सनद साठी अर्ज करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे. 

जागेला आला सोन्याचा भाव शहरात जागेला सोन्याची किंमत आल्याने, भूमाफियांची खुल्या जागा, शाळा मैदानझ समाजमंदिर, शासकीय जागा आदिवर नजर आहे. महापालिका शाळेच्या मैदानावर एका सामाजिक संस्थेने सनद काढल्याचा प्रकार सध्या गाजत आहे. हे टाळण्यासाठी जागेला सनद देतांना प्रांत कार्यालयाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर