शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी रोखण्यासाठी सुरक्षारक्षक?

By admin | Updated: March 22, 2016 02:18 IST

पाणीचोरीला कायमचा आळा घालण्यासाठी एमआयडीसी मोठ्या जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव डोंबिवलीतील एमआयडीसीकार्यालयाने

मुरलीधर भवार,  डोंबिवली पाणीचोरीला कायमचा आळा घालण्यासाठी एमआयडीसी मोठ्या जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव डोंबिवलीतील एमआयडीसीकार्यालयाने मुंबईतील मुख्य कार्यालयास पाठवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.बारवी व आंध्र धरणातून उल्हास नदीपात्रात पाणी सोडले जाते. एमआयडीसी जांभूळ येथे ते पाणी उचलून तेथे जलशुद्धीकरण करते. त्यानंतर, ते एक हजार ७७२ मिलिमीटर व्यासाच्या मोठ्या जलवाहिन्यांतून वाहून नेले जाते. एक जलवाहिनी जांभूळ फॉरेस्ट नाका, अंबरनाथ औद्योगिक वसाहत, खोणी, शीळमार्गे काटईकडे येऊन मिळते. तर, दुसरी जलवाहिनी टाटा पॉवर, पिसवली, गोळवली, दावडी, पिंपळेश्वर, कोळेगाव, काटई, देसाई, शीळमार्गे नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा परिसरात जाते. या जलवाहिनीद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराला पाणीपुरवठा केला जातो. कल्याण-शीळ व अंबरनाथ-शीळ मार्गावरील हॉटेल्स, ढाबे, सर्व्हिस सेंटरवाले सर्रासपणे या जलवाहिन्यांतून बेकायदा नळजोडण्या घेतात. त्याद्वारे पाणीचोरी होते. पाण्याची वाहनतूट ही १० ते १५ टक्के असली तरी त्यात पाणीचोरीमुळे भर पडते. पाणीचोरी रोखण्यासाठी एमआयडीसीने नोव्हेंबर २०१५ मध्ये ३५० बेकायदा नळजोडण्या तोडल्या होत्या. परंतु, त्या नळजोडण्या पुन्हा जोडण्यात आल्या. नोव्हेंबर ते आजपर्यंत पुन्हा एमआयडीसीने २४० बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई केली. एमआयडीसीचे अधिकारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तात कारवाई करतात. परंतु, अनेकदा बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई बारगळते. त्यामुळे पाणीचोरांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी जलवाहिनीच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांनी दिली.