शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सव्वातीनशे खाटा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST

ठाणे : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण ...

ठाणे : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे गोरगरीब रुग्णांना उच्च व उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी या रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. सुरुवातीला ५७४ खाटांच्या बेडला हिरवा कंदील सरकारने दिला आहे; मात्र भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आता ते ९०० खाटांचे करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला आहे.

ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. त्यात काहीवेळा गंभीर आजाराकरिता रुग्णांना उपचार मिळत नाही आणि रुग्णांची दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव सुरू होते. याची गांभीर्याने दाखल घेऊन दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी देऊन ३१४ कोटींचा निधी दिला; मात्र नंतर कोरोनाच्या महामारीमुळे पुढच्या गोष्टींना विलंब झाला; परंतु आता हे रुग्णालय आणखी मोठे करण्याच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू आहे. खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्ज केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच मंत्रालयातून शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

सध्या ५७४ खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे ठरले होते; मात्र भविष्यातील जिल्ह्यातील वाढत्या नागरिकीकरण व लोकसंख्येचा विचार करता खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने विचार करून वास्तू उभी राहण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० करून तसा नवा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे. यामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुले, डिलिव्हरी आणि महिला आणि ५०० खाटा जनरल रुग्णासाठी ठेवण्याचे सुचविले आहे. यात जनरल खाटामध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस,आयसीयू नाक, कान, घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. हॉस्पिटल उभारणीचा खर्च वाढून अंदाजे ५२७ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

...............

नव्या रुग्णालयाच्या इमारतीत दोन बेसमेंट, ग्राउंडफ्लोअर, सोबतच टेरेसवर हेलिपॅड बांधले जाणार आहे. रुग्णाला इमर्जन्सीमध्ये आणायचे झालेच तर एअर ॲम्ब्युलन्सने आणण्याची सोय केली जाणार आहे. तसेच नवा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडून काढण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

--