शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

भंडार्लीतील ठामपाच्या प्रस्तावित कचराभूमीला मनसेचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:44 IST

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील १४ गावांमधील मौजे भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी करून ...

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील १४ गावांमधील मौजे भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी करून मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे.

याबाबत पाटील यांनी सांगितले की, ठाणे शहरातील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदूषणाची समस्या असताना ठाणे महानगरपालिका आपला दैनंदिन कचरा जबरदस्तीने या गावांच्या माथी मारत असल्याने सर्व गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्थानिकांचा आहे विरोध

वास्तविक १४ गावे ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट नसून ग्रामपंचायती आहेत. तसेच आपली गावे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू असून, तसा ग्रामपंचायतींनी ठराव करून शासनास सादर केला आहे. याच भूमिकेतून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय बहिष्कार घातला आहे. आधीच या सर्व गावांना अनधिकृत केमिकल गोदामांनी घेरले असून, रासायनिक पदार्थांच्या साठ्यांमुळे नदी, नाले, जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. गावात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही, आरोग्य सुविधासुद्धा नाहीत. त्यात आता कचराभूमीची भर पडल्यास प्रदूषण अधिक वाढणार आहे. अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून कचराभूमी प्रकल्प मात्र कुणालाही विश्वासात न घेता लादण्यात येत आहे.

ठामपाला कानपिचक्या

ठाणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी शून्य कचरा मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी प्लान्ट उभारून कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावल्यास अशाप्रकारे कचराभूमी उभारण्याची गरज भासणार नाही व दिव्यासह सर्वच भाग डम्पिंगमुक्त, कचरामुक्त होईल, जनभावना लक्षात घेऊन आधीच प्रदूषणग्रस्त असलेल्या १४ गावांमधील भंडार्ली येथील प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प तातडीने रद्द करावा, असे पाटील यांनी सांगितले.

----------------------