शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पत्रीपुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:01 IST

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर; मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकचेही नियोजन नाही

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा पत्रीपूल पाडण्याचे काम महिनाभरपासून खोळंबले आहे. नव्या पुलासाठी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती रेल्वेच्या अभियंत्यांनी दिली. पूर्ण पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला विशेष ब्लॉक घ्यावे लागणार असून, त्याचेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे एमएसआरडीसी समोरही पेच असून काम सुरू करायचे असले तरी रेल्वेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता होत नसल्याचे स्पष्ट झाले.जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामास सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यावेळी केवळ पुलावरील डांबर उखडण्यात आले. मात्र, त्यानंतर पूल पाडण्याचे काम महिनाभरापासून खोळंबले आहे. त्यासाठी विशेष मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. उपनगरी आणि लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकामध्ये हे विशेष ब्लॉक कसे, कधी घ्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्याचेही नियोजन होत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसमोरही पेच निर्माण झाला आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडेही नव्या पुलाची परवानगी प्रलंबित आहे.दरम्यान, जुन्या पुलावरून जाणारी वाहतूक शेजारील अरुंद पुलावरून वळवण्यात आली आहे. तेथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त आहेत. गोविंदवाडी बायपास, तसेच ९० फुटी रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांना दीड तास खोळंबून राहावे लागत आहेत. शिवाजी चौक ते पत्रीपूल, असा दुतर्फा प्रवास नकोसा झाला आहे. इंधन व वेळेचा अपव्यय, यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग असल्याने समस्येत आणखी वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढणारी कोंडी, बंद असलेल्या पुलावरून होणारी पादचाºयांची ये-जा, यामुळे तेथे अपघाताची शक्यता आहे.मनसेचे शनिवारी ठिय्या आंदोलनपत्रीपुलानजीच्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या वतीने मनसे शनिवारी पत्रीपुलानजीक ठिय्या आंदोलन करणार आहे. पुलाच्या दुतर्फा ठिय्या मांडून पूल पाडणार कधी, नवा कधी बांधणार, तोपर्यंत नागरिकांनी काय करायचे असा सवाल करत हे आंदोलन होणारच, असे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले. नागरिकांनी किती काळ आणि का घुसमट सहन करायची असे ते म्हणाले. आपापल्या परीने सहभागी होण्यासाठी वाहनचालकांनी काळे झेंडे, काळ्या रिबिन वाहनांवर बांधाव्यात आणि निषेध व्यक्त करावा, असेही आवाहन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली