शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:36 IST

राज्य शासनाची मंजुरी आवश्यक : बारमालकांत खळबळ

सदानंद नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : देशातील काही शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविकांनी महासभेत मांडलेला उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव सोमवारी बहुमतानी मंजूर झाल्याने, बारमालक व दारूच्या दुकानदारात खळबळ उडाली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी महासभेत दिले. राज्य शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर दारुबंदी लागू करणारी ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरेल.उल्हासनगरात डान्सबार, बार, हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग, हुक्का पार्लर आदीच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून अंमली पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत आहे. याप्रकाराने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी केला. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व शेकडोंचे संसार उघडे होण्यापासून वाचवण्यासाठी गावात दारूबंदी लागू करण्याप्रमाणे शहरात दारूबंदी लागू करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत आणला होता. विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, भाजपचे गटनेता जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, मीना सोंडे, प्रमोद टाले यांच्यासह विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दारूबंदीबाबत मते मांडली. अखेर दारूबंदी लागू करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत प्रस्ताव एकमताने मंजूर झाला.महापालिका महासभेत प्रथमच दारूबंदीच्या प्रस्तावावर सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र महासभेत दिसले. दारूबंदीला विरोध दिसायला नको, म्हणून काही सदस्यांनी दारूबंदीच्या प्रस्तावाला नाईलाजास्तव मंजुरी दिली, अशी कबुली काही सदस्यांनी दिली. गेल्या काही वर्षात शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली, असा ठाणे आयुक्तालयाचा अहवाल सांगतो. शहरात गांजा यासारख्या अंमली पदार्थासह गावठी दारू ची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी केला. हॉटेल, बार, महिला डान्सबार, लॉजिंग-बोर्डिंग, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर आदीमुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे सुर्वे म्हणाले. सदर ठरावाची महासभा इतिवृत्ताची वाट न पाहता, अंमलबजावणी करण्याची मागणी बहुंताश नगरसेवकांनीआयुक्तांकडे केली.गावाप्रमाणे उल्हासनगरात दारूबंदी कायदा लागू करावा- वसुधा बोडारेएखाद्या गावातील ग्रामपंचायतीने ठरवा केल्यावर त्या गावात दारूबंदी लागू होते त्याप्रमाणे उल्हासनगर शहरात दारूबंदी लागू करावी. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होईल, असे मत शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे यांनी व्यक्त केले. महापालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करणारी ही देशातील पहिली महापालिका असेल, असे मत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. शहरात दारूबंदी लागू झाल्यास नागरिक, कॉलेज तरूणी, महिला, मुले आदीच्या मनातील भीती कमी होईल, असेही चौधरी म्हणाले.कलानी यांच्या साम्राज्याला हादरा : उल्हासनगरातील पप्पू कलानी यांचे साम्राज्य एकेकाळी दारु व्यवसायावर उभे राहिले. त्याच शहरावरील कलानी कुटुंबाची पकड ढिली झाली आहे. भाजपने कलानी कुटुंबातील व्यक्तीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे टाळले तर विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी यांचा भाजपच्या कुमार आयलानी यांनी पराभव केला. काल-परवापर्यंत उल्हासनगरची आमदारकी व महापौरपद कलानी यांच्या घरात होते. सध्या त्यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नाही. त्यामुळे दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर झाला तर कलानी यांच्या साम्राज्याला धक्का बसेल, असे बोलले जाते.आयुक्तांची भूमिका महत्त्वाची : शिवसेनेच्या नगरसेविकांनी मांडलेला अशासकीय ठराव मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठवायचा किंवा कसे, याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. उल्हासनगरात शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली असून या ठिकाणी डान्सबार, बार मोठ्या संख्येनी आहेत. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना होणाºया कमाईत वाढ करण्याकरिता तर दारुबंदीचे अस्त्र उचलले गेले नाही ना? अशी शंका काही