शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देश सशक्त करण्यासाठी त्यांनी केली ५,३०० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 07:11 IST

साबरमती व्हाया कन्याकुमारी ते कोलकाता, पाच महिने १० दिवसांत पालथे

- जान्हवी मोर्येडोंबिवली : शांतता, पर्यावरण, मूल्याधिष्ठित शिक्षण, मानवतावादी दृष्टिकोन, स्त्रियांना समानतेची वागणूक, ही पाच तत्त्वे प्रत्येकाने अंगीकारल्यास देश सशक्त होईल, हा संदेश देण्यासाठी डोंबिवलीतील विद्याधर भुस्कु टे यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अहमदाबाद (साबरमती आश्रम) ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते कोलकाता, असा पायी प्रवास त्यांनी १२ एप्रिलला पूर्ण केला. पाच हजार ३०० किमीचे हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना पाच महिने १० दिवस लागले.भुस्कुटे या पदयात्रेसाठी २८ आॅक्टोबरला डोंबिवलीहून निघाले होते. ३१ ऑक्टोबरला त्यांनी साबरमती आश्रम येथून चालण्यास प्रारंभ केला. या पदयात्रेचा मार्ग किनारपट्टीलगतचा होता. त्यासाठी सहा ते सात महिने लागतील, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, त्यांनी ही पदयात्रा पाच महिने १० दिवसांत पूर्ण केली. साबरमती आश्रम येथून ते कन्याकुमारीला गेले. तेथे त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे आशीर्वाद घेतले. तेथून ते चालत पश्चिम बंगालजवळ रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन येथे गेले. हे पाच हजार ३०० किमीचे अंतर कापण्यासाठी ते दररोज ३५ किमी अंतर चालत असत. या प्रवासात सर्वात जास्त ४८ किमीचे अंतर त्यांनी एक दिवस कापले होते. महात्मा गांधीजींचे विचार, भारत जोडो, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि टागोरांचे विचार आजच्या पिढीत रुजावे, या हेतूमुळे त्यांची ही पदयात्रा महत्त्वाची ठरली.पदयात्रेत भुस्कुटे पहाटे ३.३० वाजता चालण्यास सुरुवात करत. ८ वाजता ते चहा व नाश्ता घेत. त्यानंतर, पुन्हा ११.३० वाजेपर्यंत चालत. त्यानंतर, जेवणानंतर ते थोडी विश्रांती घेत असत. दुपारी ४.३० वाजता पुन्हा चालायला ते सुरुवात करत ते थेट रात्री ९ वाजता ते थांबत असत. या काळात ते दुपारी जेवणात पोळीभाजी तर, रात्रीच्या जेवणात खिचडी, वरणभात असा हलका आहार ते घेत होते. धणे-जिरे-पाणी, ड्रायफु्र ट्स व गूळ त्यांनी सेवन केले. मधुमेहामुळे त्यांच्या खाण्यावर मर्यादा होत्या. आधीच्या पदयात्रेपेक्षा समुद्रकिनाऱ्याच्या भागातील मार्ग कठीण होता. कारण, तेथील वातावरण दमट होते. या प्रवासात शाळा-महाविद्यालये, नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. आतापर्यंत त्यांनी १३ हजार ५०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. त्यासाठी त्यांना २९ लाखांचा खर्च आला आहे. आयुष्याची मिळकत त्यांनी या कार्यासाठी वापरली आहे.पुडुचेरी येथे अपघातभुस्कुटे यांना या यात्रेदरम्यान पुडुचेरी (पॉँडिचेरी) येथे एका दुचाकीने धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. खांदा फ्रॅक्चरही झाला. ते आठ दिवस रुग्णालयात होते. परंतु, आपले मिशन पूर्ण झाल्याशिवाय घरी न परतण्याचा निर्धार त्यांनी कुटुंबीयांकडे व्यक्त केला.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी पुन्हा जेथे अपघात झाला, तेथूनच पुन्हा चालणे सुरू केले. रुग्णालयातील आराम पुढच्या प्रवासाला बळ देणारा ठरला. ध्येयाने पछाडलेले असल्यामुळे आपण थकलो आहे, असे कधी वाटलेच नाही, असे भुस्कुटे यांनी सांगितले.चालण्याचा वसाभुस्कुटे हे बँक आॅफ इंडियामधून निवृत्त झाल्यावर त्यांच्या सुनेची पोस्टिंग काश्मीरला झाली होती. त्यामुळे ते तेथे गेले होते. एके दिवशी गार्डनमध्ये फिरताना आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार मनात आला. त्यांच्या घरातच सर्वजण स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी चालण्याचा वसा घेतला.यापूर्वी केल्या दोन पदयात्रा, अनेक विक्रमांची नोंदभुस्कुटे यांनी आतापर्यंत दोन पदयात्रा पूर्ण केल्या आहेत. त्यात एका पदयात्रेत श्रीनगर ते कन्याकुमारीदरम्यानचा तीन हजार ८८९ किमीचा प्रवास, तर दुसºया यात्रेत किबिथू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर हा चार हजार ८९ किमीचा असा एकूण आठ हजार किमीचा प्रवास केला होता.या प्रवासांतील अनुभवांवर आधारित अनुक्रमे ‘एका विद्याधराची भ्रमणगाथा’ आणि ‘एक झपाटलेला’ ही पुस्तके लिहिली. त्यांच्या पहिल्या पदयात्रेची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’मध्ये झाली. या पदयात्रेत ते दररोज ३० ते ३२ किमी अंतर चालत असत. तर, एके दिवशी ४७ किमी अंतर पार केले.पहिली पदयात्रा त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी १२५ दिवसांत पूर्ण केली. तर, दुसरी पदयात्रा त्यांनी १२२ दिवसांत पूर्ण केली. या पदयात्रेची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्ड, एशिया बुक आॅफ रेकार्ड, इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये झाली आहे.