शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:06 IST

डॉ. विजय सूर्यवंशी : केडीएमसी आयुक्तपदाची स्वीकारली सूत्रे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न मोठा आहे. रस्ते, वाहतूककोंडी आणि शहर स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. याशिवाय, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी आठवडाभरात बैठक घेतली जाईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.

गोविंद बोडके यांच्या जागी नियुक्ती केलेले आयुक्त सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पदभार सांभाळला. पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महापालिका क्षेत्रात नागरिकीकरण झपाट्याने होत असून, त्यामुळे पायाभूत सोयीसुविधांची आवश्यकता आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासह रिंगरोड, दुर्गाडी खाडीपूल तसेच पत्रीपुलाचेही काम सुरू आहे. याशिवाय, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते विकासही सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतानाच शहर स्वच्छतेवरही भर दिला जाईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेले उपक्रम पुढे नेले जातील. स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ब्रीदवाक्य घेऊन पालिका काम करणार आहे.

महापालिकेवर भ्रष्टाचाराचा शिक्का आहे. अनेक अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत पकडले गेले आहेत. यावर काय करणार, असा सवाल केला असता, भ्रष्टाचार आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.आॅनलाइन सेवेला प्राधान्यच्जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना नागरिकांना बहुतांश सेवा आॅनलाइन देण्याचे काम केले होते. त्याच धर्तीवर नागरिकांना सेवा देताना मानवी हस्तक्षेप टाळण्याचे जास्तीतजास्त प्रयत्न केले जातील. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.च्महापालिकेची दोन मोठी रुग्णालये आहेत. महापालिकेचे उत्पन्न कमी असून, रुग्णालयात डॉक्टरांची उणीव भासते. त्यामुळे सामान्यांना आरोग्यसेवा देता येत नाही.च्जिल्हा परिषदेच्या धर्तीवर वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने कंत्राटी डॉक्टर भरती करणे किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घेणे शक्य आहे का, हे तपासले जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.आधारवाडी डम्पिंगची केली पाहणीकल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ही कल्याण-डोंबिवलीची सर्वात मोठी समस्या आहे. या ग्राउंडची पाहणी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच केली. या ग्राउंडचे क्षेत्र किती आहे, दररोज किती कचरा येतो, त्यावर काय उपाययोजना करणे शक्य आहे, याविषयीची माहिती आयुक्तांनी घेतली. डम्पिंगची दुर्गंधी रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यासंदर्भात आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना सूचना केली. यापूर्वीच्या आयुक्तांनीही डम्पिंगची पाहणी करून ते बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आले नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आव्हान नव्या आयुक्तांपुढे कायम आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ, सहायक आयुक्त गणेश बोरोडे, सहायक अधिकारी अगस्टीन घुटे आदी यावेळी त्यांच्यासोबत होते.